देश

बारावीच्या मूल्यमापनाची पद्धत ठरविण्यासाठी CBSCला 10 दिवसाची मुदत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. परंतु बारावीचा निकालासाठी अंतर्गत मूल्यमापनाचा आराखडा तयार करण्यात येणार असून त्याआधारे निकाल जाहीर होणार आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी सीबीएसईने १२ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती नेमली असून येत्या दहा दिवसांत समितीला आराखडा तयार करून तो सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

देशात कोरोनाचा संसर्ग अद्यापही कायम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा विचार करून केंद्र सरकारने ‘सीबीएसई’च्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. आता अंतर्गत मूल्यमापनाच्या निकषाच्या आधारे निकाल दिला जाईल, असे स्पष्ट केले आहे. हा निकाल देण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन आराखडा दिला जाणार असून ‘सीबीएसई’चे परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांनी निकालाच्या निकषांचा आराखडा तयार करण्यासाठी समिती स्थापन केल्याचे परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. लवकरच याबाबत प्राथमिक चर्चा करण्यासाठी समितीची बैठक होणार आहे.

केंद्रीय शिक्षण विभागाचे सहसचिव विपिन कुमार, नवी दिल्लीतील शिक्षण संचालक उदित प्रकाश राय, केंद्रीय विद्यालय संघटन आयुक्त निधी पांडे, नवोदय विद्यालय समितीचे आयुक्त विनायक गर्ग, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षांचे प्रतिनिधी, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांचे प्रतिनिधी यांसह बारा तज्ञांचा समावेश असणारी समिती आराखडा निश्चितीसाठी काम करणार आहे.

या समितीचा आराखडा इतर राज्यातील बोर्डाच्या बारावीच्या निकालासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे सीबीएसई बारावीच्या निकालासाठी ठरविण्यात येणाऱ्या  मूल्यमापन आराखड्याकडे शिक्षण विभाग, विद्यार्थी, पालक यांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT