Jairam Ramesh esakal
देश

Jairam Ramesh : हा न्यायपालिकेला धमकाविण्याचा प्रकार; काँग्रेस नेते खासदार जयराम रमेश यांचा आरोप

निवडणूक रोखे हा भ्रष्टाचाराचा अफलातून प्रकार आहे

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली ः ‘‘निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून झालेला महाभ्रष्टाचार उघड झाल्यानंतर देशातील २१ सेवानिवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना लिहिलेले पत्र हा न्यायपालिकेला धमकावण्याचा प्रकार आहे,’’ असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस खासदार जयराम रमेश यांनी आज केला.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘निवडणूक रोखे हा भ्रष्टाचाराचा अफलातून प्रकार आहे. ‘चंदा दो, धंदा लो’ या प्रकारातील हा भ्रष्टाचार सर्वोच्च न्यायालयामुळे उघड झाला आहे. यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. यानंतर आता काही सेवानिवृत्त न्यायाधीशांना हाताशी धरून न्यायपालिकेवर दबाव टाकण्याचा प्रकार केला जात आहे. या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या सेवानिवृत्त न्यायाधीशांची नावे वाचली तरी हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून लिहिण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.’

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT