Jairam Ramesh esakal
देश

Jairam Ramesh : हा न्यायपालिकेला धमकाविण्याचा प्रकार; काँग्रेस नेते खासदार जयराम रमेश यांचा आरोप

निवडणूक रोखे हा भ्रष्टाचाराचा अफलातून प्रकार आहे

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली ः ‘‘निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून झालेला महाभ्रष्टाचार उघड झाल्यानंतर देशातील २१ सेवानिवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना लिहिलेले पत्र हा न्यायपालिकेला धमकावण्याचा प्रकार आहे,’’ असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस खासदार जयराम रमेश यांनी आज केला.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘निवडणूक रोखे हा भ्रष्टाचाराचा अफलातून प्रकार आहे. ‘चंदा दो, धंदा लो’ या प्रकारातील हा भ्रष्टाचार सर्वोच्च न्यायालयामुळे उघड झाला आहे. यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. यानंतर आता काही सेवानिवृत्त न्यायाधीशांना हाताशी धरून न्यायपालिकेवर दबाव टाकण्याचा प्रकार केला जात आहे. या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या सेवानिवृत्त न्यायाधीशांची नावे वाचली तरी हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून लिहिण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.’

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT