Jairam Ramesh esakal
देश

Jairam Ramesh : हा न्यायपालिकेला धमकाविण्याचा प्रकार; काँग्रेस नेते खासदार जयराम रमेश यांचा आरोप

निवडणूक रोखे हा भ्रष्टाचाराचा अफलातून प्रकार आहे

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली ः ‘‘निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून झालेला महाभ्रष्टाचार उघड झाल्यानंतर देशातील २१ सेवानिवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना लिहिलेले पत्र हा न्यायपालिकेला धमकावण्याचा प्रकार आहे,’’ असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस खासदार जयराम रमेश यांनी आज केला.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘निवडणूक रोखे हा भ्रष्टाचाराचा अफलातून प्रकार आहे. ‘चंदा दो, धंदा लो’ या प्रकारातील हा भ्रष्टाचार सर्वोच्च न्यायालयामुळे उघड झाला आहे. यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. यानंतर आता काही सेवानिवृत्त न्यायाधीशांना हाताशी धरून न्यायपालिकेवर दबाव टाकण्याचा प्रकार केला जात आहे. या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या सेवानिवृत्त न्यायाधीशांची नावे वाचली तरी हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून लिहिण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.’

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT