Tikait_Modi 
देश

"आपण बचावलो" असं मोदींनी सांगणं म्हणजेच स्टंटबाजी - राकेश टिकैत

अशा प्रकारच्या बातम्या चालवणं हा समानुभूती मिळवण्याचा प्रकार

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पंजाबच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा ताफा अडवण्यात आल्यानं सध्या देशभरात मोठा गदारोळ सुरु आहे. यावर आता भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी भाष्य केलं आहे. मोदींचा हा स्टंट असल्याचं सांगताना सहानुभूती मिळवण्याचा प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (To say by PM Modi I saved in Punjab is a stunt says Rakesh Tikait)

टिकैत म्हणाले, "पंतप्रधान जेव्हा पंजाबला आले तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी कशा प्रकारे तयारी करण्यात आली. पण पंतप्रधानांनी स्वतः असं म्हणणं की, मी बचावलो. यावरुन हे स्पष्ट होतं की, हा त्यांचा स्टंट होता. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी वापरलेला हा खालच्या दर्जाचा मार्ग आहे"

केंद्र सरकारनं याप्रकरणी म्हटलंय की, मोदींच्या दौऱ्यामध्ये सुरक्षेमध्ये त्रुटी होत्या. तर पंजाब सरकारचं म्हणणं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेच्या ठिकाणी गेले नाहीत कारण तिथं अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. दोन्ही सरकारं आपला बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं पंतप्रधानांनी त्या ठिकाणी जायलाच नको होतं, असंही टिकैत यांनी म्हटलं आहे.

पंजाबमधील दौऱ्यात नक्की काय घडलं होतं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ही सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर सुमारे 15 ते 20 मिनिटे अडकून पडला होता. सुरक्षेच्या कारणस्तव पंतप्रधान मोदींना पुन्हा भटिंडा विमानतळावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT