trai directs telecom companies to have at least 1 plan allowing 30 days recharge validity  
देश

30 दिवस वैधता असलेला एकतरी रिचार्ज प्लॅन हवा; TRAI चे निर्देश

सकाळ डिजिटल टीम

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) दूरसंचार कंपन्यांबाबत कठोर होत सर्व दूरसंचार कंपन्यांना 30 दिवस म्हणजे संपूर्ण महिन्यासाठी वैधता असणारा कमीत कमी एक टॅरिफ प्लॅन (Tariff Plan) असणे बंधनकारक केले आहे. TRAI कडून रिचार्ज प्लॅनच्या वैधतेबाबत (Recharge Plan Validity) टेलिकॉम कंपन्यांना तसे निर्देश देण्यात आले आहेत.

रिचार्जबाबत सूचना

ट्रायने म्हटले आहे की, किमान एक प्लॅन संपूर्ण महिन्यासाठी वैध असावा. तसेच प्रत्येक कंपनीच्या प्लॅनमध्ये एक विशेष व्हाउचर, कॉम्बो व्हाउचर संपूर्ण महिन्यासाठी व्हॅलिडिटी असलेले ठेवावे लागेल. ज्यामध्ये 30 दिवसांची रिचार्ज व्हॅलिडिटी मिळते. ट्रायने 1999 च्या दूरसंचार आदेशात बदल करत, गुरुवारी सांगितले की, प्रत्येक दूरसंचार सेवा प्रदात्याने किमान एक प्लॅन व्हाउचर, एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि तीस दिवसांची वैधता असलेले एक कॉम्बो व्हाउचर ऑफर केला पाहिजे. तसेच पुढे, प्रत्येक सेवा प्रदात्याने किमान एक प्लॅन व्हाउचर, एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि एक कॉम्बो व्हाउचर देखील ऑफर केले पाहिजे जे प्रत्येक महिन्याच्या त्याच तारखेला रिन्यू करता येईल.

28 दिवसांच्या व्हॅलिडिटी बाबात तक्रार

TRAI ने सांगितले की, त्यांना 28 दिवसांच्या वैधतेसह (किंवा त्यापेक्षा जास्त) दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या टॅरिफ प्लॅनबद्दल नाराजी व्यक्त करणाऱ्या तक्रारी ग्राहकांकडून मिळाल्या आहेत. 30 दिवस किंवा एक महिन्यासाठी वैधता असलेल्या टॅरिफ ऑफरबद्दल ट्रायने सांगितले की, नव्या दुरुस्ती लागू झाल्यानंतर, दूरसंचार ग्राहकांना चांगली वैधता आणि कालावधीची सर्व्हिस ऑफर निवडण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply : मुंबईकरहो पाणी जपून वापरा, तब्बल तीन दिवस होणार पाणी कपात; नेमकं कारण काय?

Madras High Court to Vijay Thalapathy : करूर चेंगराचेंगरी प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने विजय थलपतींना फटाकरलं!

Cough Syrup Ban : कफ सिरप प्यायल्याने मध्यप्रदेश अन् राजस्थानमध्ये ११ बालकांचा मृत्यू; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Dr. Baba Adhav : शब्दांचे खेळ न करता सरकारने संकटग्रस्तांबरोबर उभे राहावे

Latest Marathi News Live Update: सिसारखेडा येथे गावकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

SCROLL FOR NEXT