corona. 
देश

मोठी बातमी! महाराष्ट्रातून दिल्लीत जाणाऱ्या प्रवाशांसाठी 'कोरोना' नियम

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- देशातील काही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्ली अलर्ट झाली आहे. देशातील पाच राज्यातील नागरिकांना दिल्लीत यायचं असल्यास त्यांना कोरोनाची चाचणी करुन घेणं आणि रिपोर्ट निगेटिव्ह येणं अनिवार्य असणार आहे. महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि पंजाब राज्यातून दिल्ली येणाऱ्या नागरिकांनी निगेटिव्ह RT-PCR दाखवल्यावर दिल्लीमध्ये एंट्री मिळणार आहे. वृत्तसंस्था एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी जवळपास 70 टक्के रुग्ण या पाच राज्यातून आहेत. त्यामुळे दिल्ली सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि पंजाब राज्यातून दिल्ली जाणाऱ्या लोकांना अगोदर कोरोना चाचणी करुन घ्यावी लागणार आहे. या राज्यातून आलेल्या लोकांची 72 तासांच्या आत केलेल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पाहूनच त्यांना दिल्लीत प्रवेश दिला जाणार आहे. 

दिल्ली सरकारने जारी केलेला हा आदेश 26 फेब्रुवारीच्या रात्रीपासून 15 मार्चच्या दुपारी 12 पर्यंत लागू असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे विमान, ट्रेन आणि बसने दिल्लीत येणाऱ्या प्रवाशांसाठी हा नियम असणार आहे. दिल्लीत कारने येणाऱ्या प्रवाशांना यातून सूट असणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. विशेष करुन महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT