WHO. 
देश

'15 एप्रिलपर्यंत भारतात 50 हजार मृत्यू?' WHO चं स्पष्टीकरण; वाचा व्हिडिओमागील सत्य

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोना महामारीचं संकट अद्यापही कायम आहे. भारतासारख्या देशात कोरोनाच्या तीव्र प्रादुर्भावाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. जगभरातील स्थिती अद्याप संपूर्णपणे नियंत्रणात नाहीये. अशा पार्श्वभूमीवर या महासंकटासोबतच अनेक प्रकारच्या अफवा देखील सोशल मीडियावर पसरत आहेत. कोरोना रोगापेक्षाही या अफवाच जास्त हानीकारक असल्याचं चित्र दिसून येतंय. कारण या अफवांमुळे सनसनाटी तर पसरतेच सोबतच खोटी माहिती पसरल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर भीतीचं आणि दहशतीचं वातावरण देखील पसरतं. या अफवांमुळे फक्त आपलं कुटुंबच नव्हे तर संपूर्ण देश एका नव्या संकटात सापडू शकतो. अलिकडेच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत असा दावा केला गेलाय की, 15 एप्रिलपर्यंत देशात 50 हजार लोकांचा कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने मृत्यू झाला आहे. हा व्हिडिओ खोटा असल्याचा निर्वाळा केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. WHO च्या प्रादेशिक कार्यालयाने एक स्पष्टीकरण जाहीर करत म्हटलंय की, हा व्हिडिओ खोटा आहे आणि त्यांनी या व्हिडिओत दावा केल्याप्रमाणे कसल्याही प्रकारचा इशाला जाहीर केला नाहीये. 

WHO ने ट्विट करत म्हटलंय की, 15 एप्रिलपर्यंत देशात कोरोनामुळे 50 हजार मृत्यू झाल्याचा दावा करणारा व्हिडिओ फेक आहे. WHO ने असा कोणत्याही प्रकारचा इशारा दिला नाहीये. 

काय म्हटलंय व्हिडिओत?
WHO आणि आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे की, 15 एप्रिलपर्यंत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 50 हजार मृत्यू होण्याचा दावा खोटा आहे. या व्हिडिओत असा देखील दावा केला गेलाय की, भारतासाठी येणारे 72 ते 108 तास खूपच महत्त्वपूर्ण आहेत. या व्हिडिओमध्ये WHO आणि ICMR चा हवाला दिला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये असं देखील म्हटलं गेलंय की भारत लवकरच सामुदायिक संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहचू शकतो. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT