Corona Numbers Sakal
देश

तुघलकी लॉकडाऊन हेच कोरोनाविरोधी धोरण; राहुल गांधी यांची केंद्रावर टीकेची झोड

पहिली पायरी तुघलकी लॉकडाऊन, दुसरी पायरी घंटी वाजवा आणि तिसरी पायरी म्हणजे देवाची प्रार्थना, हेच केंद्र सरकारचे कोरोनाविरोधातील धोरण आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे आज बरसले.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - पहिली पायरी तुघलकी लॉकडाऊन, दुसरी पायरी घंटी वाजवा आणि तिसरी पायरी म्हणजे देवाची प्रार्थना, हेच केंद्र सरकारचे कोरोनाविरोधातील धोरण आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे आज बरसले.

देशातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे त्यांनी आज ट्विटद्वारे लक्ष केले. कोरोनाला रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत असल्याची टीका गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते करीत आहेत. राहुल यांनी कालही टीकात्मक ट्विट केले होते. ‘ना टेस्ट केल्या जात, ना रुग्णालयात बेड आहे, वा व्हेंटिलेटर आहेत. ऑक्सिजनही नाही आणि लसही नाही. फक्त लसीकरण महोत्सवाचे ढोंग आहे,’ अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली होती.

विधानसभा निवडणुकांच्या प्रचारातही काँग्रेस मोदी सरकारवर टीका करीत आहे. त्यात खास करून कोरोनाच्या परिस्थितीचा दाखला देऊन टीका केली जात आहे. पश्‍चिम बंगालमध्ये एका सभेत राहुल यांनी, हे मोदी सरकार नाही, तर दोन-तीन उद्योगपतींचे सरकार आहे, असे म्हटले होते. भारतात लसीचा तुटवडा असल्याचे कारण देत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियांका वद्रा आणि राहुल यांनी लस निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी केली होती.

प्रत्येकाचे प्रियजन, परिवारातील व्यक्तींना कोरोनचा संसर्ग होतो आहे. त्यामुळे कोरोना संबंधी सुरक्षेची सर्व काळजी घ्या, मास्क लावा. आपल्या सर्वांना मिळून कोरोनाविरोधातील लढ्यात जिंकावे लागेल.

- प्रियांका वद्रा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT