बहरामपूर (पश्चिम बंगाल) - सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात आंदोलन सुरू असताना आज पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात हिंसाचार उसळला. जलंगी भागात तृणमूल काँग्रेस नेते आणि स्थानिक नेत्यांत झालेल्या धुमश्चक्रीत दोन जण ठार, तर एक जण जखमी झाला आहे.
या वेळी काही वाहनांची तोडफोड झाली, तर काही वाहने पेटवून देण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जलंगी येथे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते एनआरसी आणि सीएएच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करत होते, त्यास स्थानिक नागरिक आणि नेत्यांनी विरोध केला. त्यामुळे वादास सुरुवात झाली.
दोन्ही बाजूंनी हाणामारी सुरू झाली आणि एकमेकांवर बॉम्बफेक करण्यात आली. असंख्य गाड्यांची मोडतोड करत त्या पेटवून देण्यात आल्या. यात दोघांचा मृत्यू झाला. यादरम्यान तृणमूल काँग्रेसचे खासदार अबू ताहेर यांनी या घटनेत तृणमूलचा सहभाग नसल्याचा खुलासा केला; परंतु हा हिंसाचार काँग्रेस समर्थक आणि सीपीआय (एम)च्या कार्यकर्त्यांनी घडवून आणल्याचे ताहेर यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.