Rahul Gandhi  
देश

Rahul Gandhi : "चोर तर चोर वर शिरजोर..."; भाजप नेत्याची राहुल गांधींवर जहरी टीका

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी हे मागील काही दिवसांपासून लंडनमध्ये केलेल्या विधानावरून भाजपच्या निशाण्यावर आहेत. भाजप अजुनही राहुल गांधींच्या माफीनाम्यावर ठाम आहे. तर काँग्रेसने स्पष्ट केलं की, राहुल गांधी यांनी असं कोणतही विधान केलं नाही, की ज्यामुळे माफी मागावी. यावरून भाजपनेते आणि केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं की, राहुल गांधी यांनी परदेशातून भारतावर वारंवार हल्लाबोल करणे, खोटे बोलणे, देशाची बदनामी करून माफीही न मागणे हे 'चोर तर चोर पुन्हा शिरजोर, असंच आहे. संसदेचे कामकाज व्यवस्थित चालावे, अशी आमची इच्छा आहे, पण राहुल गांधी यांनी माफी मागावी, असं ठाकूर म्हणाले.

अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष लडाख आणि अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग मानत नाही का? त्यावर राहुल यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. राहुल म्हणतात, लोकशाही संपत चालली आहे. खरे तर भारतातून कॉंग्रेस पक्ष संपून चालला आहे. संसदेत बोलण्याची संधी मिळत नाही, असे राहुल यांचे म्हणणे आहे. मात्र त्यांना प्रत्येक विषयावर बोलण्याची संधी देण्यात आली होती, पण ते तयारी न करता बोलतात, असंही ठाकूर यांनी नमूद केलं.

राहुल गांधी केंब्रिज विद्यापीठात म्हणाले होते की, जेव्हा काँग्रेसचे खासदारांची बोलण्याची वेळ येते, तेव्हा संसदेतील माइक बंद केले जातात. विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. भारतातील लोकशाहीवर थेट हल्ला होत आहे. याच विधानांवर अनुराग ठाकूर यांनी टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : भीषण अपघात! भरधाव येणाऱ्या मॅजिक व्हॅनची ट्रकला धडक, नऊ जणांचा जागीच मृत्यू

सायली-प्रिया दोघीही आई होणार! ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्वीस्ट, प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले...

Ghodegaon Accident: घोडेगाव–भीमाशंकर रस्त्यावर भीषण अपघात; समोरासमोर धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू, घोडेगाव परिसरात हळहळ..

Riyan Parag:'... तर आम्ही प्लेऑफमध्ये पोहचणार नाही', दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला रियान पराग?

राज्यातील पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी, विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक जाहीर, कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT