देश

CM योगींवर टीका; युपीच्या माजी राज्यपालांवर देशद्रोहाचा गुन्हा

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल अजीज कुरैशी यांच्याविरोधीत युपी पोलिसात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

लखनऊ - उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल अजीज कुरैशी यांच्याविरोधीत युपी पोलिसात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर अपमानास्पद टीका केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी कुरैशी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली.

युपी पोलिसांनी असं म्हटलं की, रामपूर जिल्ह्यातील सिव्हील लाइन्स पोलिस ठाण्यात भाजप कार्यकर्ते आकश सक्सेना यांचनी दिलेल्या तक्रारीनंतर कुरैशीविरोधात गुन्हा दाखल केला गेला. माजी राज्यपालांवर देशद्रोह (१२४ ए), धर्म आणि जातींमध्ये तणाव वाढवल्याच्या आऱोपाखाली कलम १५३ ए आणि राष्ट्रीय एकता आणि अखंडतेला आव्हान देणारे वक्तव्य केल्याप्रकरणी १५३ बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी सांगितलं की, सक्सेना यांनी त्याच्या तक्रारीत म्हटलं आहे की, कुरैशी हे माजी मंत्री आजम खान यांच्या घरी आमदार तंजीम फातिमा यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांनी मुख्यमंत्री योगी सरकारच्या नेतृत्वाखालील सरकारची तुलना ही रक्त पिणाऱ्या राक्षसासोबत केली होती. सक्सेना यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं की, कुरैशी यांचे वक्तव्य हे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करू शकते आणि दंगलही होऊ शकते.

रामपूरचे नेते आणि माजी मंत्री आजम खान हे सध्या तुरुंगात आहेत. तसंच कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कुरैशी हे उत्तराखंड, मिझोरामचे राज्यपाल होते. तसंच २०१२ ते २०१५ या कालावधीत त्यांच्याकडे उत्तर प्रदेशचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातून ते काँग्रेस खासदार होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

SCROLL FOR NEXT