Lakhimpur Uttar Pradesh
Lakhimpur Uttar Pradesh Team eSakal
देश

"केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडलं"

सुधीर काकडे

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये आज शेतकरी आंदोलना दरम्यान एक मोठी घटना घडली. उत्तर प्रदेशचे उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे लखीमपूर खेरीमध्ये येणार होते. यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्र टेनी हे देखील त्या ठिकाणी येणार होते. यावेळी शेतकऱ्यांनी मंत्र्यांसमोर निषेध करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र यांच्या मुलाचा आणि शेतकऱ्यांचा मोठा संघर्ष झाला. या संघर्षात जवळपास चार शेतकऱ्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला.

केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्र यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालून शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला, तसेच या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून, अनेक शेतकरी जखमी झाले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. लखीमपूर खेरीमध्ये घडलेल्या या घटनेनंतर वातावरण चिखळलं असून, त्याठिकाणी जाळपोळ झाल्याचेही समोर आले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या या घटनेचा सर्वच स्तरांतून निषेध होताना दिसतो आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. माजी कृषीमंत्री शरद पवार, काँग्रेस नेते राहूल गांधी, प्रियंका गांधी, प्रियंका गांधी तसेच अनेक इतर अनेक नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Chinmay Mandlekar: "मला वाटलं ते मुस्काटात मारतील..."; चिन्मय मांडलेकरनं सांगितला रजनीकांत यांच्या भेटीचा किस्सा

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT