vasundhara raje slam rajasthan cm ashok gehlot over saving congress government during 2020 revolt  
देश

Rajasthan Politics : घाबरून खोटं बोलतायत...; CM गेहलोतांच्या 'त्या' दाव्यावर वसुंधरा राजे स्पष्टच बोलल्या

रोहित कणसे

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी वसुंधरा राजे आणि भाजपच्या दोन आमदारांनी २०२०मध्ये माझे सरकार वाचविले होते, असा खळबळजनक दावा केला. त्यांनी यांनी काँग्रेसचे नेते सचिन पायलट आणि इतर १८ आमदारांनी जुलै २०२०मध्ये त्यांच्याविरुद्ध केलेल्या बंडावर एका जाहीर कार्यक्रमात भाष्य केलं . यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान गेहलोत यांच्या या दाव्यानंतर वसुंधरा राजे यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं झालं काय होतं?

काँग्रेसचे नेते सचिन पायलट आणि इतर १८ आमदारांनी जुलै २०२०मध्ये गेहलोत यांच्याविरुद्ध बंड केले होते. सुमारे महिनाभर चाललेल्या या प्रकरणात शेवटी पायलट यांनी उपमुख्यमंत्रिपदावरून आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर हे बंड शमले होते.

गेहलोत काय म्हणाले?

एका जाहीर कार्यक्रमात बोलताना बंडखोरी केलेल्या आमदारांनाही आशोक गेहलोत यांनी आवाहन केले. ते म्हणाले, "भाजपकडून घेतलेले पैसे परत करून टाका म्हणजे तुम्हाला कोणत्याही दबावाशिवाय तुमचे कर्तव्य पार पाडता येईल. भारतीय जनता पक्षाच्या तीन नेत्यांमुळे माझे सरकार वाचले. त्या नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, विधानसभेचे माजी अध्यक्ष कैलास मेघवाल आणि आमदार शोभाराणी कुशवाह यांचा समावेश होता."

"केंद्रीय मंत्री अमित शहा, गजेंद्रसिंह शेखावत आणि धर्मेंद्र प्रधान यांनी माझे सरकार पाडण्याचा कट रचला. त्यांनी पैसे वाटले. आता ते पैसे परत घेत नाहीत. आमदारांकडून ते पैसे का मागत नाहीत, याचे आश्चर्य वाटते", असा दावाही त्यांनी केला.

"तुम्ही जे काही दहा कोटी, वीस कोटी रुपये घेतले असतील व त्यातील जे काही खर्च केले असतील ती रक्कम मी तुम्हाला देतो किंवा ती रक्कम मी अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून घेऊन तुम्हाला देतो, ते पैसे त्यांना परत द्या," असे आवाहनही गेहलोत यांनी आमदारांना केले.

"पक्षाने मला तिसऱ्यांदा मुख्यमंत्री केले आहे. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे काम माझे आहे. जुने सर्व विसरून एकत्र या व विधानसभेच्या पुढील निवडणुकीला सामोरे जाऊ या," असे आवाहनही गेहलोत यांनी केले आहे.

वसुंधरा राजे काय म्हणाल्या?

वसुंधरा राजे यांनी अशोक गेहलोत यांच्यावर पलटवार केला आहे. त्य म्हणाल्या का अशोक गेहलोत हे २०२३ मध्ये झालेल्या परभावाची भीती वाटून खोटं बोलत आहेत. त्या म्हणाल्या की गेहलोत यांनी त्या गृहमंत्री अमित शहायांच्यावर आरोप केले आहेत ज्यांचा प्रामाणिकपणा आणि सत्य निष्ठता सर्वश्रुत आहे.

वसुंधरा राजे म्हणाल्या की, आमदारांच्या खेरदीबद्दल बोलायचे झाल्यास, याचे महारथी तर स्वतः आशोक गेहलोत आहेत. त्यांनी २००८ आणि २०१८ मध्ये अल्पमतात असल्याने हे केलं होतं. तेव्हा भाजप आणि काँग्रेस दोघांना बहुमत मिळालं नव्हतं. मनात आणलं असतं तर आम्ही सरकार स्थापन करु शकत होतो, पण ते भाजपच्या तत्वांमध्ये बसत नाही. मात्र गेहलोत यांनी पैसे वाटून आमदार जमवले आणि सरकार स्थापन केलं.

गेहलोत यांनी माझी स्तुती करणं एक मोठं षडयंत्र आहे. माझ्या जीवनात माझे आपमान गेहलोत यांनी केले आहेत तेवढे कोणी करू शकत नाही. ते २०२३ च्या आगामी निवडणूकीत होणार असलेल्या परभावापासून बचावासाठी ही काल्पनिक गोष्ट रचली आहे. हे दुर्दैवी असून ही डाव यशस्वी होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT