Vijay Rupani Team esakal
देश

... म्हणून BJP नं विजय रुपाणींना बळीचा बकरा बनवलं: काँग्रेस

गुजरात सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसने केला.

सुधीर काकडे

गुजरातचे (Gujrat) मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिला (Vijay Rupani Resign) आणि राजकीय वर्तुळात वेगवेळ्या चर्चांना उधान आलं. विजय रुपाणी यांनी हा राजीनामा देताना आपण स्वखुशीने राजीनामा देत असल्याचे सांगितले. मात्र गुजरात काँग्रेसचे (Congress) विजय रुपाणी यांना भारतीय जनता पक्षाचे (BJP) अपयश लपवण्यासाठी बळीचा बकरा बनवण्यात आला असल्याची टीका केली आहे.

गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित छावडा यांनी सांगितले की, गुजरातमध्ये असलेलं भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलं. आम्हाला माहिती आहे की, हे सरकार दिल्लीतून रिमोट कंट्रोलने चालवले जाते. ते पुढे बोलताना असंही म्हणाले की, आनंदीबेन पटेल यांना देखील अशाच प्रकारे त्यांचा कार्यकाळ संपण्यापुर्वी राजीनामा द्यायला सांगितले होते. त्यानंतर आता विजय रुपाणी यांच्या बाबतीत देखील असेच झाले. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय जनता पक्षाने त्यांचं अपयश लपवण्यासाठी विजय रुपाणी यांचा बळी दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

दरम्यान, सीआर पाटील यांना भारतीय जनता पक्षाच्या गुजरात प्रदेश अध्यक्ष पदाचा पदभार दिल्यापासुन गुजरात भाजपमध्ये अंतर्गत कलह असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता विजय रुपाणी यांच्या राजीनाम्याने आणखी शिगेला पोहोचले आहेत. तसेच राज्यात कोरोना काळात तीन लाख लोकांचा मृत्यू झाला असून, सरकार महामारीचे नियोजन करण्यात देखील अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT