देश

जगाकडून आम्हाला धर्मनिरपेक्षता, लोकशाही शिकण्याची गरज नाही - RSS

सूरज यादव

संरसंघचालक मोहन भागवत हे दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. याठिकाणी त्यांनी बुधवारी Citizenship Debate Over NRC & CAA: Assam and the Politics of History चे उद्घाटन केले. यानिमित्त गुवाहाटीत आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटलं की, जगाकडून आम्हाला धर्मनिरपेक्षता, सामाजिकता आणि लोकशाही शिकण्याची गरज नाही. आमच्या परंपरेत आणि रक्तात ते आधीपासूनच आहे. आमच्या देशाने त्याची अंमलबजावणी केली आहे आणि अजुनही देशात हे अस्तित्वात आहे.

सीएए एनआरसीमुळे भारतातील मुस्लिमांचे काही नुकसान होणार नाही असे भागवत म्हणाले. त्यांनी म्हटलं की, संविधानात आम्ही म्हटलंय की आम्ही देशातील अल्पसंख्यांकांची काळजी घेऊ. आम्ही हे केलं पण पाकिस्तानने केलं नाही. देशाच्या फाळणीवेळी नेत्यांनी घेतलेला निर्णय जनेतनं मान्य केला होता. त्यामुळे ज्यांना आता कोणी विचारत नाही त्यांची काळजी कोण घेणार? यात त्यांचा काय दोष आहे असा प्रश्नही भागवत यांनी विचारला आहे.

सर्व भारतीयांचा डीएनए एकच असल्याचं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. त्यानतंर आता नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीवर त्यांनी म्हटलं की, यामुळे कोणत्याही मुस्लिम व्यक्तीला त्रास होणार नाही. सीएए आणि एनआरसी यांचा हिंदू-मुस्लिम फूट पाडण्याशी काही संबंध नाही. राजकीय फायद्यासाठी याला धार्मिक रंग दिला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT