arvind kejriwal and supreme court sakal
देश

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या कथित अबकारी कर घोटाळा प्रकरणी ईडीनं अटक केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या कथित अबकारी कर घोटाळा प्रकरणी ईडीनं अटक केली आहे. यामुळं गेल्या महिन्याभरापासून केजरीवाल हे तुरुंगात आहेत. आता याच प्रकरणात सुनावणीदरम्यान केजरीवाल यांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? असा सवाल सुप्रीम कोर्टानं ईडीला विचारला आहे. (Why Arvind Kejriwal arrested before elections Supreme Court asks ED to respond)

अरविंद केजरीवाल हे सध्या तुरुंगातूनच दिल्लीचा कारभार हाकत आहेत. आपल्याविरुद्ध षडयंत्र रचल्याचा आरोप करत आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. पण आपल्याला झालेली अटक आणि तुरुंगवास ही बेकायदा असून ईडीच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. (Latest Marathi News)

न्या. खन्ना म्हणाले, "स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचे आहे, तुम्ही ते नाकारू शकत नाही. शेवटचा प्रश्न हाच आहे की सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी केजरीवालांवर अटकेची कारवाई का करण्यात आली?" याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टानं ईडीला यावर उत्तर देण्यास सांगितलं आहे. वारंवार समन्स पाठवल्यानंतरही विशिष्ट काळानंतरच केजरीवालांविरोधात कारवाईला वेग का आला? असा सवालही यावेळी न्या. खन्ना यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT