arvind kejriwal and supreme court sakal
देश

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या कथित अबकारी कर घोटाळा प्रकरणी ईडीनं अटक केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या कथित अबकारी कर घोटाळा प्रकरणी ईडीनं अटक केली आहे. यामुळं गेल्या महिन्याभरापासून केजरीवाल हे तुरुंगात आहेत. आता याच प्रकरणात सुनावणीदरम्यान केजरीवाल यांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? असा सवाल सुप्रीम कोर्टानं ईडीला विचारला आहे. (Why Arvind Kejriwal arrested before elections Supreme Court asks ED to respond)

अरविंद केजरीवाल हे सध्या तुरुंगातूनच दिल्लीचा कारभार हाकत आहेत. आपल्याविरुद्ध षडयंत्र रचल्याचा आरोप करत आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. पण आपल्याला झालेली अटक आणि तुरुंगवास ही बेकायदा असून ईडीच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. (Latest Marathi News)

न्या. खन्ना म्हणाले, "स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचे आहे, तुम्ही ते नाकारू शकत नाही. शेवटचा प्रश्न हाच आहे की सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी केजरीवालांवर अटकेची कारवाई का करण्यात आली?" याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टानं ईडीला यावर उत्तर देण्यास सांगितलं आहे. वारंवार समन्स पाठवल्यानंतरही विशिष्ट काळानंतरच केजरीवालांविरोधात कारवाईला वेग का आला? असा सवालही यावेळी न्या. खन्ना यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT