Rahul Gandhi 
देश

'जवानांना सीमेवर निःशस्त्र का पाठवले? जबाबदार कोण?'

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारत-चीन सीमारेषेवर गलवान खोऱ्यात सोमवारी (ता. 15) झालेल्या संघर्षामध्ये 20 जवान हुतात्मा झाले आहेत. जवानांना सीमेवर निःशस्त्र का पाठवले? याला जबाबदार कोण? असा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटवरून आज (गुरुवार) उपस्थित केला आहे.

राहुल गांधी यांनी एका माजी अधिकाऱ्याच्या मुलाखतीचा उल्लेख करत ट्विट केले आहे. ट्विटला 'कौन ज़िम्मेदार है?' असे शीर्षक देताना त्यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. चीनची एवढी हिम्मत का आणि कशामुळे झाली? जवानांना निःशस्त्र का पाठवण्यात आले ? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

राहुल गांधी यांनी या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. या सर्व प्रकरणावर पंतप्रधान शांत का आहेत तसेच ते लपून का बसले आहेत? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. याच बरोबर त्यांनी, आपल्या जमिनीवर चीनकडून हक्क का दाखवण्यात येत आहे. आपल्या भागात घुसण्याची हिम्मत का होते? या सर्व प्रश्नाची उत्तरे पंतप्रधानांनी द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, भारत-चीन सीमारेषेवर गलवान खोऱ्यात सोमवारी झालेल्या संघर्षामध्ये 20 जवान हुतात्मा झाले असून, चीन सैन्याच्या कमांडिंग ऑफिसरसह 43 जणांचा मृत्यू झाला आहे. लडाख भागातील पेनगॉंग सो येथे 5 मे पासून वाद सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs PAK: 'आम्ही कोणत्याही संघाला...', भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराने दिली वॉर्निंग

विकासासाठी शांतता हवी, मणिपूरमधील संघटनांना पंतप्रधान मोदींचं आवाहन; राज्यातील परिस्थितीवरही बोलले

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचा वापर मतांच्या राजकारणासाठीचं, निवडणुक जवळ आली पाणीप्रश्‍न पेटला; स्थानिक नेत्यांकडून जनतेच्या समस्यांना केराची टोपली

Charlie Kirk: ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांच्या हत्येप्रकरणी एफबीआयने संशयिताला ताब्यात घेतले

IPS Anjana Krishna : 'IPS अंजना कृष्णा यांना दिली खोटी माहिती'; कुर्डूत 200 ट्रक वाळूचा दावा ठरला फोल, महसूल अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT