Rahul Gandhi 
देश

'जवानांना सीमेवर निःशस्त्र का पाठवले? जबाबदार कोण?'

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारत-चीन सीमारेषेवर गलवान खोऱ्यात सोमवारी (ता. 15) झालेल्या संघर्षामध्ये 20 जवान हुतात्मा झाले आहेत. जवानांना सीमेवर निःशस्त्र का पाठवले? याला जबाबदार कोण? असा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटवरून आज (गुरुवार) उपस्थित केला आहे.

राहुल गांधी यांनी एका माजी अधिकाऱ्याच्या मुलाखतीचा उल्लेख करत ट्विट केले आहे. ट्विटला 'कौन ज़िम्मेदार है?' असे शीर्षक देताना त्यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. चीनची एवढी हिम्मत का आणि कशामुळे झाली? जवानांना निःशस्त्र का पाठवण्यात आले ? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

राहुल गांधी यांनी या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. या सर्व प्रकरणावर पंतप्रधान शांत का आहेत तसेच ते लपून का बसले आहेत? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. याच बरोबर त्यांनी, आपल्या जमिनीवर चीनकडून हक्क का दाखवण्यात येत आहे. आपल्या भागात घुसण्याची हिम्मत का होते? या सर्व प्रश्नाची उत्तरे पंतप्रधानांनी द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, भारत-चीन सीमारेषेवर गलवान खोऱ्यात सोमवारी झालेल्या संघर्षामध्ये 20 जवान हुतात्मा झाले असून, चीन सैन्याच्या कमांडिंग ऑफिसरसह 43 जणांचा मृत्यू झाला आहे. लडाख भागातील पेनगॉंग सो येथे 5 मे पासून वाद सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT