Pariksha Pe Charcha Esakal
देश

Pariksha Pe Charcha: कोरोना काळात थाळ्या वाजवायला का सांगितलं? 4 वर्षांनी पंतप्रधान मोदींनी केला खुलासा

Pariksha Pe Charcha: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक गोष्टीवर भाष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी कोरोना काळात थाळी का वाजवायला सांगितली होती, त्याबाबत खुलासा केला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक गोष्टीवर भाष्य केलं. यावेळी विद्यार्थ्यांनीही व्हर्च्युअल माध्यमातून परीक्षेच्या चर्चेत भाग घेतला आणि पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुलांना विविध उदाहरणे देऊन समजावून सांगितले की, तुम्हाला परीक्षा योद्धा बनायचे आहे, त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या कोरोना विरुद्धच्या लढ्याचे उदाहरण दिले आणि कठीण प्रसंगांना धैर्याने कसे तोंड द्यावे हे सांगितले.

'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमावेळी सर्व मुलांशी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी कोरोनाच्या काळात लोकांना थाली वाजवायला का सांगितले होते, याचा खुलासाही केला आहे. त्यांनी लोकांना कोरोना योद्ध्यांच्या नावाने दिवे लावायला का सांगितले? 2020 मध्ये कोरोनाच्या काळात लोकांना थाली वाजवण्यास का सांगण्यात आले होते. यामागचे कारण आता 4 वर्षांनंतर त्यांनी सांगितले आहे.

थाळी वाजवण्याचा उद्देश काय होता?

थाळी वाजवल्याने किंवा दारात दिवा लावल्यामुळे कोरोना माहामारीपासून आपली सुटका होणार नाही हेही मला माहीत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यामुळे कोरोनाचा कमी होत नाही. पण कोरोनाविरुद्धच्या युद्धात देशातील जनतेला एकत्र करण्यासाठी त्यांनी हे केले.

जेव्हा संपूर्ण देशातील लोक एकाच वेळी थाळी वाजवतात आणि एकाच वेळी दिवे लावतात तेव्हा त्यांना एकता दिसून येते. आपण एकट्याने कोरोनाशी लढत नसल्याचे त्यांना जाणवले. संपूर्ण देश कोरोनाचा सामना करत आहे. सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला तरच अडचणीतून बाहेर पडता येईल.

अडचणींना अजिबात घाबरू नका

कोरोना ही जागतिक महामारी आहे. त्याच्यामुळे सारे जग त्रस्त झाले होते. मी असं म्हणू शकलो असतो, मी काय करू शकतो? पण मी तसे केले नाही. मला वाटले मी एकटा नाही. देशात 140 कोटी लोक आहेत. सर्वांनी एकत्र येऊन या समस्येला तोंड दिल्यास या समस्येवर मात करू शकतो. म्हणूनच मी टीव्हीवर येत राहिलो. लोकांशी बोलत राहिलो. त्यामुळेच परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही कधीही घाबरू नका, असे पंतप्रधान मोदींनी मुलांना सांगितले. आपल्याला त्या अडचणींचा सामना करायचा आहे आणि विजय मिळवायचा आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Video : "तुझं तोंड शेणात घाल"; पहिल्याच दिवशी रुचिता-तन्वीमध्ये जुंपली !

Latest Marathi News Live Update : इस्रोचे मिशन अयशस्वी, कक्षेत पोहोचण्यापूर्वीच 'अन्वेषा' अवकाशात गायब

Devendra Fadnavis : 'जो राम का नही, ओ किसी काम का नही'; नाशिकच्या सभेत फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात

Who is Mini Kohli ? विराट कोहलीसारखा दिसणारा 'तो' चिमुकला आहे तरी कोण? रोहितही म्हणालेला, विराट, बघ, तुझा डुप्लिकेट!

Nagpur Crime: नागपूरात ‘न्यूरो ट्रेड’च्या नावाखाली १५.३७ लाखांचा गंडा; व्यावसायिकाची सायबर चोरट्याकडून फसवणूक !

SCROLL FOR NEXT