Will Scrap Triple Talaq If Comes To Power Says Congress
Will Scrap Triple Talaq If Comes To Power Says Congress 
देश

...तर तिहेरी तलाक कायदा रद्द : काँग्रेस

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेस सत्तेवर आल्यास तिहेरी तलाक कायदा रद्द करणार आहे, असे महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी आज (गुरुवार) म्हटले आहे. दिल्लीत आयोजित काँग्रेसच्या अल्पसंख्याक अधिवेशनात त्या बोलत होत्या. सुष्मिता देव या सिलचरच्या खासदार आहेत.

लोकसभा निवडणुकीपुर्वी काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. अल्पसंख्याकांमध्ये काँग्रेस पक्षाला अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आज राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे होते. यावेळी बोलताना सुष्मिता देव म्हणाल्या, 'तिहेरी तलाक कायदा करण्यामागे मुस्लीम पुरुषांना कारागृहात पाठवण्याचे षडयंत्र आहे. आपण मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या महिला शाखेला भेटून तिहेरी तलाक कायद्याला विरोध केल्याप्रकरणी त्यांचे आभर मानले.'

भाजपवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा नीट पाहिला तर तुम्हाला भीती दिसेल. मोदींनी ओळखले आहे की देशातील जनतेला विभागून पंतप्रधान बनू शकत नाही. भाजपवाले म्हणत होते की मोदी 15 वर्षे पंतप्रधानपदी राहतील, पण या वाक्याची आता गंमत उडवली जाते. यापूर्वी भाजपचे लोक म्हणत होते की, अच्छे दिन येतील, पण आता देशातील नागरिक म्हणत आहेत की चौकीदार चोर आहे. हा देश किती एका धर्माचा नाही. हा देश भारतातील प्रत्येक व्यक्तीचा आहे. लढाई दोन विचारधारांमधील आहे. अल्पसंख्यांकांनीही या देशासाठी काम केले आहे. एक विचारधारा म्हणते, देश सोन्याची चिमणी आहे, याचा अर्थ असा की, देश एक उत्पादन आहे. आमच्या विचारधारेनुसार, देश एक नदी आहे, ज्यात सगळ्यांना जागा मिळायला हवी.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

Elvish Yadav : रेव्ह पार्टीनंतर एल्वीश पुन्हा अडचणीत ; मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल

Canada: हरदीप सिंग निज्जर हत्येप्रकरणी कॅनडाची मोठी कारवाई; तीन भारतीयांना अटक

SCROLL FOR NEXT