amit shah narendra modi file photo
देश

'भाजपमध्ये जाऊन मोठी चूक केली'

नामदेव कुंभार

विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी सरकार स्थापन केलं. असं असले तरिही येथील राजकीय वातावरण अद्याप तापलेलंच आहे. यातच भाजप नेत्यानं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून भाजपमध्ये प्रवेश करुन चूक केल्याची कबूली दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर टीएमसीमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. या महिला आमदाराची सध्या सोशल मीडियाव चर्चा सुरु आहे. टीएमसीमधून चार वेळा आमदार राहिलेल्या सोनाली गुहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना शनिवारी पत्र लिहिलं आहे. 'भाजपात प्रवेश करून चूक केली, दिदीशिवाय जिवंत राहू शकत नाही,' असं सोनाली यांनी आपल्या पत्रात म्हणत घरवापसी करण्याची विनवणी केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेते भाजपत दाखल झाले होते. आमदार खासदार आणि स्थानिक नेत्यांनीही ममतांची साथ सोडली होती. मात्र, सर्व आव्हानांचा सामना करत ममतांनी सरकार स्थापन केलं. निवडणुकीच्या आधी सोनाली गुहा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सोनाली गुहा यांना ममतांच्या अतिशय विश्वासू म्हटलं जात होतं. टीएमसीकडून सोनाली गुहा यांनी चार वेळा आमदारपद भूषावलं होतं. आता सोनाली गुहा पुन्हा टीएमसीच्या वाटेवर आहेत. तसं पत्र लिहून आपल्याला पक्षात घेण्याची विनवणी केली आहे.

भाजपमध्ये प्रवेश करण्याचा माझा निर्णय चुकीचा होता. त्याची मला जाणीव होत आहे. तिथे मला नेहमीच वेगळं असल्याची जाणीव झाली. भाजपनं फक्त माझा वापर केला. ममतांची बदनामी करण्यास सांगितलं, पण मी असं केलं नाही. मी पुन्हा एकदा ममतांची भेट घेणार आहे. पुढील आठवड्यात त्यांच्या घरी जाईन, असंही सोनाली गुहा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT