10th 12th Supplementary Examination esakal
एज्युकेशन जॉब्स

Education Board : दहावी-बारावी परीक्षेच्या धोरणात्मक निर्णयाला हरताळ; निकालापूर्वीच 'या' अभ्यासक्रमाचे प्रवेश उरकले जाणार

मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडून पुढाकार घेण्याची आवश्यकता

संजीव भागवत

राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या निकालाची तयारी पूर्ण झाली आहे.

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या (Maharashtra Education Board) दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळावा, त्यांचं एक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी राज्य सरकारनं पाच वर्षांपूर्वी धोरणात्मक निर्णय घेतला होता.

मात्र, या निर्णयाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून हरताळ फासला जात आहे. बारावीच्या पुरवणी परीक्षेचा (Supplementary Examination) निकाल लागण्याअगोदरच व्यवसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटी सेलकडून पूर्ण करण्यात येत असून अनेक विद्यापीठांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमाचे प्रवेश पूर्ण होऊन नियमित महाविद्यालय सुरू झाली आहेत.

त्यामुळे बारावीच्या पुरवणी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधी संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संदर्भात उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडून पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्यासंदर्भात त्यांच्याकडून कोणतीच पावले उचलली जात नसल्याने राज्यातील लाखो विद्यार्थी पालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

सीईटी सेलच्या माध्यमातून घेण्यात येणारी इंजिनिअरिंग कृषी त्यासोबतच औषधनिर्माणशास्त्र आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मात्र, यामध्ये बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संधीचा कोणताही विचार करण्यात आला नाही, यामुळे बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे काय होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दुसरीकडे दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी संधी दिली जाणार आहे. त्यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून विशेष फेरीचे आयोजन केले जाणार आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने देखील राज्यातील सरकारी, खासगी आयटीआयमध्ये रिक्त राहणाऱ्या जागांवर दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी नियोजन केले आहे.

मात्र, बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढे व्यावसायिक अभ्यासक्रम, तसेच पारंपरिक पदवी अभ्यासक्रम आदी प्रवेशाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. याच पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण विभागात या संदर्भात कोणकोणत्या उपाययोजना केल्या जातील याविषयीची विचारणा सुरू करण्यात आली असल्याचे अधिकारी सूत्राकडून सांगण्यात आले.

कृषी अभियांत्रिकी यादी व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या जागा रिक्त राहिल्या असल्यास त्यावर बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी काहीच हरकत नाही, तसेच ज्या विद्यापीठांमध्ये पदवीचे प्रवेश पूर्ण झालेले आहेत, अशा विद्यापीठातील अनेक महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागांचा शोध घेऊन त्यावर प्रवेश देणे आवश्यक असून त्यावर विभागाकडून पावले उचलण्यास काहीच हरकत नसल्याचे उच्चस्तरीय अधिकारी सूत्राकडून सांगण्यात आले.

दोन दिवसात दहावी-बारावीचा निकाल

राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या निकालाची तयारी पूर्ण झाली असून हा निकाल येत्या दोन दिवसांत जाहीर केला जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदा या परीक्षादरम्यान राज्यात अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाल्याने काही पेपर लांबणीवर पडले होते.

त्यामुळे या दोन्ही परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी उशीर झाला आहे. मात्र, आता मंडळाकडून त्यासाठीची पूर्ण तयारी करण्यात आली असल्याने येत्या दोन दिवसात हा निकाल जाहीर होणार असल्याचे अधिकारी सूत्राकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT