admission sakal
एज्युकेशन जॉब्स

विद्यार्थ्यांना मिळेना पसंतीचे महाविद्यालय

नव्वद टक्क्यांपेक्षा कमी गुण असल्याने प्रतीक्षा, तिसऱ्या फेरीनंतरही स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘दहावीच्या परीक्षेत ८५.२० टक्के गुण आहेत, एवढे गुण मिळाल्याने मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, शेजाऱ्यांकडून भरपूर कौतुक झाले. परंतु, अकरावीच्या प्रवेशासाठी आतापर्यंत झालेल्या फेऱ्यांमध्ये अद्याप हवे ते महाविद्यालय मिळाले नाही. आता नाइलाजास्तव दुसरा आणि तिसरा पर्याय म्हणून निवडलेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे,’’ अशा शब्दांत अर्णव (नाव बदललेले आहे) आपल्या भावना व्यक्त करत होता. दहावीत ९० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्या अर्णवसारख्या हजारो विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयात प्रवेशासाठी मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत अकरावीसाठी नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा, म्हणून विद्यार्थ्यांचा आग्रह कायम आहे. त्यामुळे प्रवेश फेऱ्यांसाठी पात्र असूनही २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ‘ॲलॉट’पासून लांब राहावे लागत आहे. यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह अन्य बोर्डांच्या दहावीच्या निकालात कमालीची वाढ झाली. तसेच ९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे.

त्यामुळे नामांकित महाविद्यालयांमधील प्रवेशाचा ‘कट-ऑफ’ तिसऱ्या फेरीतही नव्वदीपार आहे. दरम्यान शहरातील काही नामांकित महाविद्यालयांमधील प्रवेश ‘फुल्ल’ झाले आहेत. त्यामुळे ९० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयातील प्रवेशासाठी तिसऱ्या फेरीनंतरही प्रतीक्षा करावी लागत आहे.

प्रवेश एकूण पात्र निवड निवड प्रवेश घेतलेले

फेऱ्या जागा विद्यार्थी झालेले न झालेले विद्यार्थी

८६,४८२ ५६,७६७ ३८,८५८ १७,९०९ २४,५००

६३,७५७ ३५,६९४ १५,९६७ १९,७२७ ७,६१२

५६,६३५ २९,५०५ ९,२६१ २०,२४४ ---

टक्क्यांपेक्षा कमी गुण असणाऱ्या आणि अद्याप पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी करिअर समुपदेशकांचा सल्ला घ्यावा. आपली गुणवत्ता आणि महाविद्यालयांचा कट-ऑफ पाहून पसंतीक्रम नोंदवावा. जेणेकरून महाविद्यालये लवकर ‘ॲलॉट’ होतील. दुसऱ्या, तिसऱ्या पसंतीक्रमाच्या महाविद्यालयांचा गांभीर्याने विचार करावा. त्यासाठी संबंधित महाविद्यालयांना भेटी द्याव्यात. प्राचार्यांशी संवाद साधावा, महाविद्यालयांतील सुविधांची माहिती घ्यावी आणि आपले पसंतीक्रम बदलावेत.

- डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय

बहुतांश विद्यार्थी हे नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळावा, म्हणून अट्टहास करतात. विद्यार्थ्यांनी मिळालेले गुण आणि कट-ऑफ पाहून पसंतीक्रम देणे गरजेचे आहे, तरच विद्यार्थ्यांना लवकर महाविद्यालये ॲलॉट होऊ शकतील. विद्यार्थ्यांनी वेळ वाया न घालविता आपल्या गुणांनुसार महाविद्यालये निवडावी आणि अकरावीच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

- मीना शेंडकर, सदस्य सचिव, अकरावी ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समिती

नामांकित महाविद्यालयांचा कट-ऑफ जास्त आहे. त्यामुळे दहावीत चांगले गुण मिळूनही पहिल्या पसंतीचे महाविद्यालये अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे आता दुसऱ्या, तिसऱ्या पसंतीक्रमाच्या महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी प्रयत्न करत आहे.

- अथर्व चोपडे, विद्यार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT