एज्युकेशन जॉब्स

Indian Army NCC Recruitment 2021: 15 जूलैपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत

सैन्यदलातील अधिकारी पदासाठी १५ पर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय सैन्यदलातर्फे राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला व पुरुष उमेदवारांसाठी विशेष प्रवेश योजने अंतर्गत अधिकारी पदाकरिता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांना येत्या गुरुवारपर्यंत (ता. १५) अर्ज भरता येईल.

‘एनसीसी स्पेशल एंट्री’च्या ५० व्या कोर्ससाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. याबाबतची अधिसूचना सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ५५ जागांसाठी उमेदवारांना अर्ज भरता येईल. यामध्ये ५० जागा पुरुष तर, ५ जागा महिला उमेदवारांसाठी ठेवण्यात आली आहे.

देशातील कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. यासाठी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे तसेच, एनसीसीचे ‘सी सर्टिफिकेट’ असणे आवश्‍यक आहे. तर यासाठी वयोमर्यादा १९ ते २५ पर्यंत ठेवण्यात आली आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी तसेच अर्ज करण्याकरिता इच्छुक उमेदवारांना सैन्यदलाच्या joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT