School.
School. Gallery
एज्युकेशन जॉब्स

विसर पडलेल्या शाळा सोमवारपासून सुरू होतील, पण...

राजाराम माने : सकाळ वृत्तसेवा

चार ऑक्‍टोबरपासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. शाळा सुरू होणार असल्या तरी, विद्यार्थ्यांना मात्र शाळेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.

केत्तूर (सोलापूर) : गेल्या दीड वर्षापासून शाळा (School), महाविद्यालये (College) बंद आहेत. त्याचा मोठा परिणाम शिक्षणावर (Education) झाला आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी याचा ग्रामीण भागात म्हणावा तितका उपयोग झालाच नाही. त्यामुळे विद्यार्थी मात्र अभ्यासापासून दूर झाली आहेत. या कारणामुळे पालक वर्गातून पाल्याच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त होत असतानाच, 4 ऑक्‍टोबरपासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. शाळा सुरू होणार असल्या तरी, विद्यार्थ्यांना मात्र शाळेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही 'कही खुशी, कही गम' असेच वातावरण आहे.

कोरोना संसर्गामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण मात्र सुरू होते. परंतु ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचले का? हा संशोधनाचा विषय झाला आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी महागडा मोबाईल, त्यासाठी रिचार्ज हे बेरोजगारीच्या काळात पालकांना परवडले नसले तरी त्यामुळे ऑनलाइन शिक्षण नावालाच राहिले. मुलांना मात्र मोबाईलचे वेड लागले व ते ऑनलाइन शिक्षणाव्यतिरिक्त मोबाईल गेम, व्हॉट्‌सऍप चॅटिंग करू लागले. सर्वच मुले पुढील वर्गात गेली असली तरी त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे काय? हा प्रश्न मात्र गुलदस्तातच राहिला आहे.

कोरोनाची दुसरी लाट संपल्याच्या तसेच तिसऱ्या लाटेला थांबवण्याच्या पार्श्वभूमीवर 4 ऑक्‍टोबरपासून शाळा सुरू होणार असल्या तरी, शाळेत विद्यार्थी संख्या पूर्ववत राहणार का? सर्व विद्यार्थी शाळेत येणार का? की बहुतांश मुले शाळाबाह्य होणार? विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी शासन काय आणि कसे प्रयत्न करणार? याविषयी मात्र कोणीही काहीही बोलण्यास तयार नाही. एकूणच, कोरोनामुळे विद्यार्थ्यांना मात्र शाळेचा विसर पडला आहे, हे निश्‍चित!

उजनी लाभक्षेत्रात मजुरांची टंचाई असल्याने शेतकऱ्यांनी परजिल्ह्यातून मजूर आणले आहेत. ते येथील शेतकऱ्यांकडे सालाने काम करतात. गेल्या चार- पाच वर्षांपासून ते येथेच राहात आहेत. अशा मजूर कुटुंबीयांच्या मुलांसाठी पालकांना महागडा मोबाईल घेता न आल्याने मुलांना ऑनलाइन शिक्षण मिळालेच नाही. अशी मुले दोन-दोन वर्षे पुढील वर्षात जात असतील तर, त्यांचे शैक्षणिक भवितव्य काय? तसेच आता शाळा सुरू झाल्यानंतर ती पुन्हा शाळेत जाणार का? हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे.

गेल्या वर्षापासून कोरोनामुळे जरी शाळा बंद असल्या तरी गावोगावी सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना आपापल्या परीने ऑनलाइन शिक्षण देत होते. ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नव्हते त्यांच्यासाठी शिक्षकमित्र हा उपक्रम राबवून ऑफलाइन अभ्यास देण्याची सोय केली होती. यावर्षी सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रतिसादाला आवाहन देत शिक्षकांनी झाडाखालची तसेच पारावरची शाळा सुरू केली. 4 ऑक्‍टोबरपासून शाळा सुरू होणार असल्याने शिक्षक, पालक यांच्यासोबत विद्यार्थ्यांना सुद्धा खूप आनंद झाला आहे.

- तानाजी धायगुडे, मुख्याध्यापक, केत्तूर नं. दोन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT