what is open book test Esakal
एज्युकेशन जॉब्स

Open Book Test नेमकी आहे तरी काय? CBSE ने का घेतला निर्णय? ही परीक्षा अवघड असणार का? तज्ज्ञ काय म्हणतात?

पुस्तक आणि नोट्स वापरून लिहिलेल्या उत्तराने सगळी मुलं पास होतील..?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने येत्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात होणाऱ्या परीक्षेमध्ये 'ओपन बुक टेस्ट' घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पुस्तक आणि नोट्स वापरून लिहिलेल्या उत्तराने सगळी मुलं पास होतील.. मुलांना काहीच येणार नाही असे समज गैरसमज पालकांमध्ये पसरलेले पाहायला मिळत आहेत.

त्यामुळे एकूणच ओपन बुक टेस्ट म्हणजे काय, ती लागू करण्यामागे हेतू काय?, ती परीक्षा घेण्याची पद्धत काय? या सगळ्याची माहिती घेण्याचा प्रयत्न या बातमीच्या माध्यमातून करूया..

ओपन बुक टेस्ट म्हणजे काय?

ओपन बुक टेस्ट म्हणजे विद्यार्थी परीक्षा देत असताना आपल्या पुस्तक, त्यांनी काढलेल्या नोट्स, अभ्यासाचे साहित्य परीक्षा हॉल मध्ये नेऊ शकतात, त्याचा वापर करून प्रश्नांची उत्तरे लिहू शकतात.

हा निर्णय सीबीएसईच्या सर्वच विद्यार्थ्यांना लागू असणार का?

सध्या तरी नाही. सुरुवातीच्या टप्प्यात सीबीएसईने हा प्रयोग काही निवडक शाळांमध्येच करायचे ठरविले आहे.

त्यातही सर्व मुलांवर नाही तर इयत्ता ९ वी १० वी च्या इंग्रजी, गणित आणि विज्ञान या तीन विषयांसाठी तर ११ वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजी आणि जीवशास्त्र (बायोलॉजी) या विषयांसाठीच लागू असणार आहे.

ओपन बुक टेस्ट घेण्याचा प्रयोग करण्यामागे सीबीएसईचा हेतू काय?

पारंपरिक पद्धतीच्या पलीकडे जात तणावमुक्त आणि कौशल्यावर आधारित परीक्षा असणे ही काळाची गरज ओळखून अशा प्रकारची परीक्षा पद्धती घेण्याचा विचार सीबीएसई करत आहे.

सुरुवातीला या प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अशा प्रकारे परीक्षा देण्यासाठी किती वेळ लागतो याचा अभ्यास केला जाणार आहे.

तसेच अशा प्रकारे परीक्षा पद्धतीवर विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिप्राय देखील घेण्यात येणार आहे. यासाठी त्यांनी दिल्ली विद्यापीठाची मदतही घेतली आहे.

याबाबत शिक्षण तज्ज्ञांचे मत काय?

याविषयी बोलताना एसएससी बोर्डाचे माजी अध्यक्ष डॉ.वसंत काळपांडे म्हणाले, 'ओपन बुक टेस्ट' चा प्रयोग हा चांगला आहे आणि तो खूप आवश्यक देखील आहे. खरे तर हा प्रकार नवीन नाही पण काही कारणांमुळे मागे पडला. पण ओपन बुक टेस्ट म्हणजे पुस्तकात पाहून उत्तरे लिहिणे एवढाच अर्थ यातून घेतला जाऊ नये.

यासाठी एक उदाहरण देतो. समाज मला एखादा लेख लिहायचा आहे, याविषयी माझे ज्ञान आहेच पण मला याविषयी आणखी माहिती घ्यायची आहे तर मी चार पुस्तके वाचीन त्यातून संदर्भ घेईन, ती गोष्ट समजून घेईन आणि मग ती माझ्या शब्दांमध्ये उतरवीन.

यामध्ये मी कोणत्या पुस्तकांचा किंवा कोणत्या संकेतस्थळावरून संदर्भ घ्यायचा यासाठी कौशल्य लागतील , या विषयात लिहिलेल्या चार पुस्तकांविषयी माहिती होईल. त्यातून मला जे हवे ते शोधताना मला अनेक गोष्टींचा अभ्यास होईल.

प्रत्येक गोष्ट प्रत्येक बाबतीत कशी लिहिली आहे, प्रत्येक दृष्टिकोन कसा आहे त्याचाही अभ्यास होईल. त्यातून मी विचार करून माझे स्वतःचे मत तयार करेन आणि मत तयार करताना त्या गोष्टीवर नक्कीच विचार करेन त्याशिवाय माझे मत तयार होणार नाही.

तसेच ती गोष्ट समजल्याशिवाय मला लिहिता येणार नाही. ही परीक्षा स्मरणशक्तीवर आधारित नसून कौशल्य आणि विचारशक्तीवर आधारित असेल. ज्यातून संकल्पना स्पष्ट होणे हा महत्वाचा हेतू साध्य होऊ शकेल.

तसेच यासाठी प्रश्नांची निवड करताना शिक्षकांना त्यांची कौशल्य वापरावी लागणार आहेत. प्रश्न अशा पद्धतीने तयार करायचा ज्याची उत्तरे ही ठराविक एका उताऱ्यात न मिळता संपूर्ण विषय समजल्यावरच ती लिहिता येतील.

एखाद्या धडयाबाबत प्रश्न विचारायचे झाल्यास पात्राने असा निर्णय घेण्यामागे काय विचार केला असावा? ही संकल्पना काय आहे? अशा प्रकारचे प्रश्न विचारल्याने याची उत्तरे ही धडा समजल्याशिवाय देता येणे कठीण असेल..

ओपन बुक टेस्ट चा प्रयोग याआधी कुठे झाला आहे?

आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली, आयआयटी इंदौर या शैक्षणिक संस्थेत, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, अलिगढ मुस्लिम विद्यापीठ अशा नामांकित विद्यापीठांमध्ये देखील असे प्रयोग झाले आहेत. तसेच याबाबत झालेल्या संशोधनातून विद्यार्थ्यांचा ताण कमी होत असल्याचेही समोर आहे आहे.

----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT