bhang in holi 
फूड

Holi ला भांग प्यायल्यानंतर काय काळजी घ्याल? 'या' टिप्स फॉलो करा

होळी सुरू व्हायला जेमतेम आठवडा उरला आहे

सकाळ डिजिटल टीम

होळी सुरू व्हायला जेमतेम आठवडा उरला आहे. यावर्षी निर्बंध शिथील झाल्याने होळी साजरी करण्यासाठी लोकं उत्सुक आहेत. रंग लावण्याचा जसा लोकांना उत्साह असतो तसेच अनेकांना भांग प्यायलाही आवडते. पण जे पहिल्यांदा भांग पिणारे आहेत त्यांना भांग प्यायल्यानंतर काय होतं हे माहिती नसतं. त्यामुळे अशा लोकांनी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही भांग प्यायल्यानंतर काही गोष्टी खाताना काळजी घ्या. नाहीतर त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

जास्त खाऊ नका

या गोष्टी लक्षात ठेवा

जास्त खाऊ नका - भांग प्यायल्यानंतर लोकांना जास्त भूक लागते. पण अशावेळी तुम्हाला संयम ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही मर्यादित प्रमाणात कुठलाही पदार्थ खाल्ला पाहिजे. अतीप्रमाणात पदार्थ खाल्लेत तर तुम्हाला अपचन, पोट खराब होणे अशा काही समस्या येऊ शकतात.

औषध घेऊ नका- भांग प्यायल्यानंतर अनेकांना नशा चढते. लोक शुद्धीत नसतात. त्यामुळे काही जण नशा उतरविण्यासाठी किंवा डोकं जड झाल्याने औषध घेतात. पण असे औषध घेणे शरीरासाठी नुकसान करणारे असू शकते.

no Alcoholic

मद्यपान करणे टाळा - आरोग्यासाठी मद्यपान तसेही वाईटच असते. तुम्ही भांग प्यायल्यानंतर जर मद्यपान करणार असाल तर तुमच्या आरोग्यावर याचे वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला चक्कर येणे, मळमळ अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

जास्त फिरू नका- भांग प्यायल्यानंतर महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे जास्त फिरायचे नाही. कारण भांगेची नशा हळूहळू चढते. त्यानंतर आजूबाजूच्या गोष्टी नीट लक्षात राहत नाहीत. त्यामुळे तुम्हाला चक्कर येऊ शकते तसेच अपघात होण्याची भिती आहेच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT