Rice Benefits  esakal
फूड

रात्री भात खाणे योग्य असते का? जाणून घ्या तथ्य

भारतात भात खूप खाल्ला जातो

सकाळ डिजिटल टीम

भारतात भात खूप खाल्ला जातो. तो कार्बोहायड्रेटचा चांगला स्त्रोत आहे. खाण्यास तसेच पचण्यास सोपा असलेल्या भातापासून पुलाव, बिर्याणी, खीर, डोसा इत्यादी विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. तर, डाळी, छोले, राजमा आणि कढीबरोबर भात खाणेही अनेकांना आवडते. भात खाण्यामुळे आरोग्याचे अनेक फायदे होतात. तुमची पचनशक्ती चांगली ठेवण्यासोबतच अॅंटी ऑक्सिडंटयुक्त भात खाल्ल्याने फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी होण्यासही मदत होते. तसेच, फायबर आणि प्रथिने पुरेश्या प्रमाणात असल्याने मधुमेहाच्या रूग्णांना त्याचा फायदा होतो.

rice

होतील हे फायदे

तज्ज्ञांच्या मते, तज्ञ फायबर भरपूर असल्याने भात हलका होतो तसेच सहज पचतो. त्यामुळे रात्री भात खाण्याने काही नुकसान होत नाही. उलट चांगली झोप येण्यासही भात उपयुक्त ठरतो. जे लोक खूप बारीक असतात, त्यांनाही रात्री भात खाण्यामुळे अडचण येत नाही.पण जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर मात्र रात्री भात खाणे टाळले पाहिजे. रात्रीऐवजी तुम्ही सकाळी भात खाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला पोषण मिळेल शिवाय वजनही वाढणार नाही. दिवसा चयापचय क्रिया वेगाने काम करते. त्यामुळे तुमचे शरीर वेगाने अन्न पचवते. म्हणून दिवसा भात खाल्ल्यास तो लवकर पचू शकतो. तसेच यामुळे तुम्हाला उर्जा मिळते. तांदूळात कार्बोहायड्रेट असतात. त्यामुळे तुमच्या शरीराला आणखी एनर्जी मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

'एक दिवाने की दिवानियत' चित्रपटाच्या डबिंगदरम्यान रडला हर्षवर्धन राणे

Athletics Championships: नीरज-अर्शदकडून निराशा, पण भारताच्या सचिनचं पदक फक्त ४० सेंटीमीटरने हुकलं; जाणून कोण ठरलं विजेता

Latest Maharashtra News Updates : तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदावरुन संजय शिरसाठ यांची हकालपट्टी करा, तृतीयपंथी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT