Holi Puranpoli Benefits For Health  
फूड

पुरणपोळी आवडते! त्याचे आरोग्याला होणारे फायदे वाचा

पुरणपोळीत वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकामुळे शरीराला फायदे होतात

सकाळ डिजिटल टीम

होळीला आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. महाराष्ट्रातल्या अत्यंत लोकप्रिय असा हा पदार्थ आहे. पुरणपोळी कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते. थंडी सरलेली असते आणि उन्हाळ्याला नुकतीच सुरूवात झालेली असते. या काळात पुरणपोळी खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदे होऊ शकतात. गव्हाचे, मैदा, हरभऱ्याची डाळ, गूळ, वेलची, जायफळ असे घटक एकत्र करून पुरणपोळी केली जाते. यातील प्रत्येक घटकात स्वत:चे गुणधर्म आहेत. त्यामुळे हे घटक एकत्र झाल्याने शरीराला चांगले फायदे होतात.

असे आहेत फायदे

गव्हाचे पीठ आरोग्यासाठी चांगले असते. काही जण मैदा वापरतात. पण मैदा शरीरासाठी चांगला नसल्याने तुम्ही फक्त कणीक वापरून पुरणपोळी करू शकता. त्यामुळे हा पदार्थ आणखी पौष्टीक होईल. गव्हाच्या पिठात तयार केलेल्या पुरण पोळीमध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, बी-कॉम्प्लेक्स, जीवनसत्त्वे आणि काही खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. त्याचा फायदा तुमच्या शरीराला होतो. तसेच कणीक आणि डाळ एकत्र केल्याने तुम्हाला प्रथिने मिळतात. तसेच अमिनो अॅसिड मिळत असल्याने शरीरास अधिक फायदा होतो.

Puranpoli

गुळामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस हे घटक असतात. साखरेपेक्षा गुळ पचायला थोडा वेळ लागत असल्याने उर्जा बराचकाळ पोटात साठून राहतो. त्यामुळे पचनसंस्था चांगली राहते. वेलची, केशर, जायफळ पावडर हे घटक पचन आणखी वाढवतात. त्यामुळे पुरणपोळी खाऊन शरीराला या काळात फायदाच होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT