Ganeshotsav 2022 esakal
Ganesh Chaturthi Festival

Ganeshotsav 2022: गणेश विसर्जन १० दिवसांनीच का होतं? महाभारताशी निगडित 'हे' कारण

दर वर्षी येणारा गणेशोत्सव यंदा ३१ ऑगस्टला सुरू होणार आहे. तुम्हाला माहिती आहे का गणपती स्थापनेनंतर १० दिवसांनी का होते? जाणून घेऊया कारण.

सकाळ डिजिटल टीम

गणेशोत्सवात घरोघरी गणरायाची स्थापना होते. आणि १० व्या दिवशी अनंत चतुर्दशीला विसरजन केले जाते. काही ठिकाणी दीड किंवा पाच दिवसांचाही गणपती असतो. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात गणेशोत्सावाची धामधूम अधिक असते. पण कधी विचार केला आहे का की, बहुतांश ठिकाणी गणपती १० दिवसांनीच का विसर्जित केला जातो. या मागे एक खास कारण आहे, ज्याचा संबंध महाभारताशी निगडीत आहे.

काय आहे कथा, जाणून घेऊ

असे मानले जाते की, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात गणेश चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला. तसेच या दिवसापासूनच महाभारताचे लेखन सुरू झाले होते असा पौरणिक कथांमध्ये उल्लेख आहे. महाभारताचे लेखन सुरू होण्याआधी महर्षी व्यास यांनी गणरायाला हे लिपीबध्द करण्याची विनंती केली होती. गणेशाने सांगितले की, त्यांनी लिहायला सुरूवात केली तर ते थांबणार नाहीत. आणि जिथे ते थांबतील तिथे थांबले मग पुन्हा लिहिणार नाही.

त्यावेळी महर्षी व्यास म्हणाले की, देवा तुम्हाल विद्वानांचे पण विद्वान आहात आणि मी सामान्य ऋषी , जर माझ्याकडू एखादा श्लोक चुकला तर तुम्ही तो कृपया दुरूस्त करून घ्या. अशा प्रकारे महाभारताचे लेखन सुरू झाले आणि सलग १० दिवस चालले.

अनंत चतुर्दशीला जेंव्हा महाभारत लेखनाचे काम पूर्ण झाले, तेंव्हा गणरायांचे शारीर जडवत झाले होते. अजिबात न हलल्याने त्यांच्या शरीरावर धूळ, माती जमा झालेली होती. तेंव्हा गणरायांनी सरस्वती नदीत जाऊन स्नान केले होते. म्हणून गणेशाची स्थापना १० दिवस होते व मग विसर्जन केले जाते.

मनावरचा मळ काढण्याचा काळ

गणेशोत्सवाकडे अध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर हा १० दिवस संयमाने राहण्याचा, आपल्या मनावर चढलेला मळ काढून स्वच्छ करण्याचा काळ असतो. याकाळात माणसाने आत्मपरिक्षण करून आपले पूर्ण लक्ष गणरायाच्या भक्तीकडे लावावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

AFG vs SL Live : 6,6,6,NB,6,6,1w! ४० वर्षीय मोहम्मद नबीची वादळ खेळी; ६ चेंडूंत केलेल्या ५ धावा, नंतर १६ चेंडूंत ५५ धावांचा पाऊस Video

Crime News : लोणी काळभोर येथील पाच अट्टल गुन्हेगार दोन वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण जिल्ह्यातून तडीपार

Rahul Gandhi: दुसरी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी काय सिद्ध केलं? निवडणूक आयोगाला दिलेला अल्टिमेटम नेमका काय आहे?

Pune Encroachment : शहरातील हजारो चौरस फुटावरील अतिक्रमण हटवले

SCROLL FOR NEXT