Food Crisis In World  Esakal
ग्लोबल

जगात वाढतेय उपासमारी, २०२१ मध्ये ४ कोटी लोकांना अन्नच मिळाले नाही

२०२१ मध्ये ४ कोटी लोकांना अन्नच मिळाले नाही

सकाळ डिजिटल टीम

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) बुधवारी सांगितले, की युद्ध, हवामान बदल आणि आर्थिक संकटामुळे लोकांची उपजीविका नष्ट झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी भूकेशी सामना करणाऱ्या लोकांची संख्या वाढून 193 मिलियन झाली. तज्ज्ञांनी इशारा दिला, की युक्रेनमध्ये रशियाच्या (Russia) युद्धामुळे दुष्काळ पडू शकतो. एफएओने एका वार्षिक अहवालात म्हटले, की २०२१ मध्ये जवळपास ४० मिलियन आणखीन लोकांना तीव्र अन्नअसुरक्षेत ढकलण्यात आले. उपासमारीची समस्येला सामोरे जाणाऱ्या ५३ देशांमध्ये, सर्वाधिक प्रभावित काँगो, इथिओपिया, येमेन आणि अफगाणिस्तान आदींचा समावेश होतो. अफगाणिस्तानमध्ये २०२१ साली तालिबानने देशावर नियंत्रण मिळविल्यानंतर देश आर्थिक संकटात अडकल्याने लाखो लोक उपासमारीचा (Hunger) सामना करावा लागत आहे. (Hunger is increasing in across globe food crisis in 2021)

अन्न असुरक्षा काय आहे ?

संयुक्त राष्ट्रसंघानुसार तीव्र अन्न असुरक्षा म्हणजे एखाद्या व्यक्तीला पुरेसं अन्न मिळत नाही. एफएओने म्हटले, दुष्काळात आणि मृताचे कारण हे उपासमारीच आहे. २०१६ मध्ये एफएओ, जागतिक अन्न कार्यक्रम आणि युरोपीय संघाद्वारा पहिला अहवाल प्रकाशित झाल्यानंतर ही संख्या सतत वाढत आहे. एफएओने म्हटले की २०२१ मध्ये वाढते युद्ध, हवामान बदल आणि आर्थिक संकटाचे मिश्रण आहे. यामुळे ५३ देशांमधील लोक प्रभावित झाले आहेत.

अहवालात युक्रेन युद्धाबाबत लक्ष नाही

अहवालात युक्रेनमधील युद्धाचा विचार केला गेलेला नाही. मात्र एफएओने म्हटले आहे, की खाद्य संकट असणारे देश आणि दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभ्या लोकांवर सर्वाधिक प्रभाव टाकतो. रशिया आणि युक्रेन कृषी उत्पादनांचे प्रमुख उत्पादक देश आहेत. ती कृषी उत्पादने निर्यात करतात. यात गहू आणि सूर्यफूलाच्या तेलासह इतर उत्पादनांचा समावेश आहे. युद्धामुळे मार्चमध्ये जागतिक खाद्य किंमती उच्चस्तरावर पोहोचले. युद्धामुळे जागतिक खाद्य यंत्रणातील त्रुटी समोर आल्याचे एफएओने म्हटले आहे.

२०२१ मध्ये उपासमारीचे ही कारणे होती

२०२१ मध्ये युद्ध आणि असुरक्षा २४ देशांमध्ये तीव्र उपासमारीचे कारण होते. यात १३९ लोक प्रभावित झाले. कोविडमुळे आर्थिक धक्के बसत गेले. यामुळे २१ देशांमध्ये ३०.२ मिलियन लोक प्रभावित झाले. दुसरीकडे आठ आफ्रिकन देशांमध्ये २३.५ मिलियन लोकांसाठी तीव्र अन्न असुरक्षा मुख्य कारण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT