india, japan, china 
ग्लोबल

जपानसोबतच्या 'डील'चा भारताला चीनविरोधात होणार फायदा

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली : भारत आणि जपान या दोन्ही राष्ट्रात असा एक सामंजस्य करार झाला आहे ज्यामुळे चीनविरोधातील लढ्यात भारताची ताकद आधीपेक्षा वाढू शकते. उभय देशात सैन्यबळाची पूर्तता आणि त्यासंबधी साहित्य आदान-प्रदानाबाबत करार झाला आहे. म्हणजेच जर युद्धपरिस्थिती निर्माण झालीच तर भारत आणि जपान हे एकमेकांना मदत देऊ करतील. याआधी भारताने अमेरिका, फ्रांस, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया या राष्ट्रांशी हा करार केला आहे. भारताचे सचिव अजय कुमार आणि जपानचे राजदूत सुजूकी सतोशी यांनी 'म्यूचुयल लॉजिस्टीक सपोर्ट अरेंजमेंट' (MLSA) या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. याआधी 2016 मध्ये भारत आणि अमेरिकेने 'द लॉजिस्टीक एक्सचेंज मेमोरंडम ऑफ एग्रीमेंट (The Logistics Exchange Memorandum of Agreement - LEMOA)' हा करार केला आहे. या कराराअंतर्गत भारताला सैन्यबळाशी निगडीत मदत प्राप्त होऊ शकते. 

सध्या सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने हिंदी महासागरामध्येसुद्धा आपले सैन्यबळ अधिक सतर्क केले आहे. भारत आणि जपानदरम्यान झालेला हा करार अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे. सामंजस्य करारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे प्रधानमंत्री शिंजो आबे यांच्याबरोबर फोनवर बातचित केली. मोदी आणि आबे या दोघांनीही सुरक्षा कराराबद्दल एकमेकांचे अभिनंदन केले आणि आभारही मानले. 
भारत आणि जपानचे रणनीतीविषयक संबध हे आधीपासूनच आहेत.

जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, या करारामुळे दोन्ही देशांच्या सैन्यामधील सहकार्याला प्रोत्साहन मिळेल. अशी अपेक्षा आहे की या करारामुळे जपानी आणि भारतीय सशस्त्र सेना यांच्यात शस्त्र पुरवठा आणि सेवांचे सहज आणि जलद आदान प्रदान होईल. भारतीय संरक्षण मंत्रालयाने असे म्हटले आहे की भारत आणि जपानच्या सशस्त्र दलांमधील परस्पर सहकार्य वाढल्यामुळे उभय देशांमधील विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारीत द्विपक्षीय सबंध आणखी वाढतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जसप्रीत बुमराह पुढची मॅच नाही खेळणार; महत्त्वाचे अपडेट्स, IND vs OMN सामन्यात Playing XI कशी असणार?

माेठी बातमी! 'सोलापुरातील रोज चार व्यक्तींना पोटाच्या कर्करोगाचे निदान'; सकस आहार अन् स्वच्छतेचा अभाव, जंकफूडचे वाढते प्रमाण घातक

Raj Thackeray : नक्की कोण जिंकलं? कोण हरलं? भारत-पाक सामन्यावरून राज ठाकरेंचे फटकारे, नवं व्यंगचित्र केलं शेअर....

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ, नेमकं काय घडलं ?

Ganesh Festival : राज्योत्सव संहितेची गरज; गणेशोत्सवाच्या स्वरूपावर शासनाची भूमिका स्पष्ट करावी

SCROLL FOR NEXT