Global Warming side effects sakal
ग्लोबल

Global Warming: समुद्रात बुडणार या प्रसिद्ध देशाची राजधानी; राष्ट्रपतींनी घेतला मोठा निर्णय!

इंडोनेशियाचे राष्ट्रपतींनी जकार्ताला सोडण्याचा निर्णय का घेतला ?

सकाळ वृत्तसेवा

ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमालयातील बर्फ वेगाने वितळत आहे. यामुळे समुद्रालगतची अनेक शहरे बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता देखील समुद्राच्या पाण्याखाली जाणार आहे. यामुळे तेथील राज्यकर्त्यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे जकार्ता ही राजधानी राहणार नसून बोर्निया द्वीपावर नवीन राजधानी उभारण्यात येत आहे.

इंडोनेशियाचे राष्ट्रपतींनी जकार्ताला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कालीमंतन प्रांतामध्ये यासाठी 256,000 हेक्टरवर नवीन शहर वसविले जात आहे. ही राजधानी म्हणजे एक जंगलाचे शहर असेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

यामध्ये पर्यावरणाच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे. नवीन राजधानी २०४५ पर्यंत कार्बन-न्यूट्रल बनविण्यात येणार आहे. जिथे ही राजधानी वसविली जातेय तिथे जंगल आहे. अनेक प्रकारचे वन्य प्राणी आणि आदिवासी राहत आहेत, अशा ठिकाणी राजधानी उभारण्याबाबत वाद निर्माण झाला आहे.

पर्यावरणवाद्यांनी चेतावणी दिली आहे की राजधानीमुळे मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होईल, या जागेवर राजधानी वसविण्याच्या प्रस्तावावरून वाद सुरु झाला आहे.

जंगली प्राण्यांचा अधिवास जाईलच परंतू आदिवासींचेही स्थलांतर होणार आहे. जकार्तामध्ये सुमारे १ कोटी लोक राहतात. हे शहर जगातील सर्वात वेगाने बुडणारे शहर म्हटले गेले आहे.

2050 पर्यंत या शहरातील एक तृतीयांश भाग पाण्याखाली जाणार आहे. जकार्ताची हवा आणि भूजल अत्यंत प्रदूषित आहे तसेच येथे सतत पूर येत राहतात. जकार्तामध्ये इतके लोक आहेत की रस्त्यावर चालणे कठीण हाेऊन जाते या गर्दीमुळे इंडोनेशियाच्या अर्थव्यवस्थेला वर्षाला $4.5 बिलियनचे नुकसान होत आहे.

राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी या समस्या लक्षात घेऊन बोर्निया द्वीपावर नवीन राजधानी बनवण्याची कल्पना केली जी आता प्रत्यक्षात दिसत आहे. त्यांनी कमी लोकसंख्येसह शाश्वत भांडवल तयार करण्यास परवानगी दिली आहे.

आता या नव्या राजधानीमध्ये सामान्यांना राहण्यास जागा असेल की फक्त सरकारी कर्मचारी असतील याबाबत माहिती समोर आलेली नाही. विडोडो हे बोर्नियो बेटावर नुसांतारा शहराची उभारणी करणार आहेत.

नुसंतारा हा जुना इंडोनेशियन शब्द आहे ज्याचा अर्थ द्वीपसमूह आहे. या नव्या राजधानीत सरकारला सर्व काही नव्याने उभारावे लागणार आहे.

सरकारी इमारती, घरांची पुनर्बांधणी केली जाणार आहे. पुढील वर्षी 17 ऑगस्ट २०२४ रोजी इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त या शहराची बांधणीला सुरुवात होणे अपेक्षित आहे. 2045 मध्ये इंडोनेशिया आपला शंभरावा वर्धापन दिन साजरा करेल. 2045 पर्यंत राजधानी पूर्णपणे बांधली जाईल असे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री थोडक्यात बचावले, उड्डाण घेताच मागे जाऊ लागलं हेलिकॉप्टर, मोठी दुर्घटना टळली!

IND vs AUS, 1st T20I: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची दणक्यात सुरुवात; पावसाने खोडा घातला, पण सिडनीत विजय मिळवला

Pune: महाशिवरात्री उत्साहाला गालबोट! हरिश्चंद्र गडावर दुर्दैवी घटना, दर्शनाहून परतताना भाविकावर काळाचा घाला

T20 WC, IND vs PAK: अभिषेक शर्माचं कमबॅक होणार, कुलदीप यादवही खेळणार! भारताची पाकिस्तानविरुद्ध कशी असेल प्लेइंग इलेव्हन?

Shashikant Shinde: विलीनीकरण चर्चेस आता पूर्णविराम, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT