libya 7 indians kidnapped
libya 7 indians kidnapped 
ग्लोबल

लीबियातून 7 भारतीयांचे अपहरण; मायदेशी परतण्यासाठी जात होते विमानतळाकडे

सकाळ वृत्तसेवा

त्रिपोली - लिबियामध्ये सात भारतीयांचे अपहरण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली आहे. लिबियातील अशवरीफ इथून या सर्वांचे अपहरण झाल्याचं त्यांनी सांगितलं. एका कन्स्ट्रक्शन आणि ऑइल कंपनीत काम करत होते. भारतात परतण्यासाठी त्रिपोली विमानतळाकडे सर्वजण जात असताना त्यांचे अपहरण करण्यात आले. 

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2015 मध्ये भारत सरकारने देशातील नागरिकांना लिबियात जाणं टाळा असं सांगितलं होतं. लिबियात जाण्यासाठी 2016 मध्ये भारताने पूर्णपणे निर्बंध घातले होते. अद्याप हे निर्बंध कायम आहेत. लिबियातील परिस्थिती बाहेरील नागरिकांसाठी सुरक्षित नसल्याचं म्हटलं होतं. आता ज्या भारतीय नागरिकांचे अपहरण झाले आहे त्यामागे कोणाचा हात आहे याची माहिती देण्यात आलेली नाही. 

अपहरण झालेल्यांमध्ये आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील नागरिकांचा समावेश आहे. सध्या या प्रकरणात ट्युनिशियातील भारतीय दुतावास पाठपुरावा करत आहे. दुतावासाकडून लिबिया सरकार आणि आंतरराष्ट्रीय संघटनांशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. भारत सरकारला अशीही माहिती मिळत आहे की, अपहरण झालेले सर्व नागरिक सुखरूप असून त्यांचे फोटोही दाखवण्यात आले आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, अपहरण झालेल्या सर्व लोकांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला आहे. तसंच अपहरण झालेल्यांची लवकर सुटका करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अपहरण करणाऱ्यांनी अपहरणग्रस्तांच्या कंपनीशी संपर्क साधला असल्याची माहिती मिळत आहे. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

भारतीयांच्या अपहरणाची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही लिबियामध्ये भारतीयांचे अपहरण झाले आहे. 2015 मध्ये चार भारतीयांचं अपहरण झालं होतं. त्यांच्या सुटकेसाठी बराच काळ लागला होता. अशाच पद्धतीने मोसुलमध्येही 39 भारतीयांचे अपहरण झाले होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT