TS-Tirumurti 
ग्लोबल

‘ड्युरँड रेषेवर शांतता गरजेची’

पीटीआय

न्यूयॉर्क - ड्युरँड रेषेवर होणारी दहशतवाद्यांची ये-जा थांबत नाही, तोपर्यंत अफगाणिस्तानात शांतता  नांदणार नाही, असे परखड मत भारताने आज संयुक्त राष्ट्रांमध्ये मांडले. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानची सीमरेषा ड्युरँड रेषा म्हणून ओळखली जाते.

पाकिस्तानमधून दहशतवादी अफगाणिस्तानात घुसखोरी करत अशांतता निर्माण करत असल्याचा भारतासह अफगाणिस्तानचाही दावा आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील विशेष सत्रात बोलताना भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती म्हणाले की, शांतता आणि संघर्ष हे एकाच वेळी असू शकत नाही. अफगाणिस्तानमध्ये दीर्घकाळासाठी शांतता निर्माण होण्यासाठी आपल्याला दहशतवाद्यांना आश्रय देणे आणि त्यांना संरक्षण देणे बंद करावे लागेल आणि ड्युरँड रेषेपलिकडील त्यांची ठिकाणे नष्ट करावी लागतील. शांततेसाठी या रेषेवरून होणारा दहशतवाद्यांचा पुरवठा बंद पाडायला हवा. सुरक्षा परिषदेने एकमताने या संघर्षाविरोधात कारवाई करणे आवश्‍यक आहे. तिरुमूर्ती यांच्या बोलण्याचा सर्व रोख पाकिस्तानकडे होता. 

अफगाणिस्तानातील शांतता प्रक्रियेला भारताचा पाठिंबा आहे. ही शांतता प्रकिया अफगाणिस्तानच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या नियंत्रणाखाली आणि त्यांच्या हितासाठी होणे आवश्‍यक आहे. येथील समस्येवरील उपाय स्थानिकांकडूनच सुचविले जाणेही आवश्‍यक आहे. 
- टी. एस. तिरुमूर्ती, ‘यूएन’मधील भारताचे प्रतिनिधी

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थप्पड प्रकरणातून हरभजन सिंगने कमावले कोट्यवधी रुपये, श्रीसंतचा मोठा दावा

Dhule Solapur Highway Accident : अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; 18 वर्षीय तरुणीला ट्रकनं चिरडलं, 250 फुटांपर्यंत नेलं फरफटत

IPL 2026 : मुंबई इंडियन्स कर्णधारपदावरून हार्दिक पांड्याची हकालपट्टी केव्हा करणार? दिग्गज खेळाडूचा थेट सवाल

UP ATS: आजोबा आझाद हिंद फौजेत, पण नातू निघाला दहशतवादी! नोएडाच्या तुषार चौहानचा 'हिजबुल्लाह' कसा झाला?

Metro 5 : कल्याण ते उल्हासनगरपर्यंत मेट्रो धावणार, १८ हजार कोटींच्या निधीला मंजूरी; कसा असेल मार्ग?

SCROLL FOR NEXT