pak railway minister sheikh rashid 
ग्लोबल

'भारत-पाकमध्ये युद्ध झाले तर अंतिम युद्ध असेल'

वृत्तसंस्था

कराचीः भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले तर ते रक्तरंजित आणि अंतिम युद्ध असेल. पाकिस्तानने भारतावर हल्ला केला तर ते अणुयुद्ध होईल, अशी गरळ पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी ओकली आहे. शिवाय, भारताविरूद्ध अणुबॉम्ब वापरण्याची धमकी दिली आहे.

शेख रशीद अहमद हे अनेकदा भारताविरोधात वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. यावेळी भारताविरूद्ध अणुबॉम्ब वापरण्याची धमकी देताना म्हणाले, पाकिस्तानजवळ अणुबॉम्ब आहे, त्याची क्षमता आसामपर्यंत पोहोचण्याची आहे. तसेच, या अणुबॉम्ब हल्ल्यांमध्ये मुस्लिमांचे नुकसान होणार नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले तर ते रक्तरंजित आणि अंतिम युद्ध असेल. पाकिस्तानने भारतावर हल्ला केला तर ते अणुयुद्ध होईल. मुस्लिमांचे प्राण वाचवताना आमचे हत्यार त्या भागांना लक्ष्य करू शकते. पाकिस्तान आसामपर्यंत लक्ष्य करू शकते.'

दरम्यान, शेख रशीद अहमद यांनी यापूर्वीही अनेकदा धमकीची विधाने केली आहेत. भारताचे नाव न घेता अणु युद्धाची धमकी दिली होती. शिवाय, युद्ध पारंपारिक मार्गाने होणार नाही, तर अणु युद्ध होईल, असेही  म्हणाले होते. पाकिस्तानकडे 125 ग्रॅम आणि 250 ग्रॅम वजनाची लक्ष्यभेदी अण्वस्त्रे असून, एका विशिष्ट लक्ष्यावर मारा करू शकतात, असेही म्हटले होते. काही दिवसांपूर्वी अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यावरून विधान केले होते. भारत हा आता धर्मनिरपेक्ष देश नाही, तर तो धर्माचा देश बनला आहे, असे ते म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Guidelines: विमानाच्या उड्डाणासाठी नवे नियम जाहीर! पायलटचा निर्णय अंतिम असणार; दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

Mumbai Local Mega Block : कांदिवली-बोरिवलीदरम्यान रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक; लोकल वाहतुकीत बदल

Talegaon Station News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्तेकामाचा अंतिम अध्यादेश जारी; डीबीओटी तत्वावर होणार काम

Maharashtra: आधार आणि किसान आयडी ब्लॉक, सरकारी योजनांपासून दूर ठेवणार अन्...; शेतरस्त्यावर अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई होणार

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार केले, नंतर...; धक्कादायक कृत्याने खळबळ, काय घडलं?

SCROLL FOR NEXT