ग्लोबल

पाकिस्तानमध्ये नात्यात विवाह करण्याने वाढली चिंता! अनुवांशिक समस्यांत वाढ

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानमध्ये जवळच्या नात्यातच लग्न करण्याची परवानगी आणि परंपरा आहे. लग्नाची ही व्यवस्था पूर्णपणे ऐच्छिक आहे. पण, आता काही जण या परंपरेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. या प्रथेमुळे अनुवांशिक विकारांची (Genetic Disorders) प्रकरणे वाढत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पाकिस्तानातील (Pakistan) जेनेटिक म्यूटेशनवर आधारित हा अहवाल (Report) २०१७ मध्ये प्रकाशित झाला. या अहवालात नात्यांमध्ये विवाह केल्याने अनुवांशिक समस्या वाढत असल्याचे दिसून आले. एका डेटाबेसनुसार, पाकिस्तानमध्ये आढळणाऱ्या 130 विविध प्रकारच्या जनुकीय विकारांमध्ये 1,000 हून अधिक उत्परिवर्तन आढळून आले आहेत.

भावंडांशी लग्न केल्याने येतात अशा समस्या

जर्मनीच्या DW न्यूजने या लग्नाच्या (Marriage) परंपरेच्या बंधनात अडकलेल्या पाकिस्तानातील लोकांबद्दल सविस्तर अहवाल तयार केला आहे. पाकव्याप्त काश्मिरमध्ये राहणारे ५६ वर्षांचे गफूर हुसेन शाह यांना आठ मुलं आहेत. शाह यांनी सांगितले की, आदिवासी रीती-परंपरेनुसार त्यांच्या मुलांचे विवाह शाह हे नात्यातच करतील, अशी अपेक्षा केली जाते. पण अशा विवाहांमुळे जन्मलेल्या मुलांमध्ये जनुकीय आजाराचे धोके किती आहेत, याची शहा यांना चांगली जाणीव आहे. 1987 मध्ये शाह यांचा विवाहमामाच्या मुलीशी झाले. . आता त्यांची तीन मुलांना अनुवांशिक विकार आहेत. शाह यांनी DW ला सांगितले की, त्यांच्या एका मुलाचा मेंदू पूर्णपणे विकसित झालेला नाही. एका मुलीला व्यवस्थित बोलता येत नाही. तर, दुसरीला ऐकू येत नाही. ही मुलं नीट अभ्यास करू शकत नाहीत याची मला जास्त खंत वाटते, मला त्यांची नेहमीच काळजी वाटते. मी आणि पत्नी नेहमीच चिंतेत असतो, असे त्यांनी सांगितले.

सामाजिक दबाव

शहा म्हणाले की, येथे अशा प्रकारे विवाह करण्यासाठी खूप सामाजिक दबाव आहे. असे लग्न न केल्यामुळे लोकांना समाजातून बहिष्कृत केले जाते. शाह म्हणाले, त्यांना त्यांचा एक मुलगा आणि दोन मुलींचे लग्न जवळच्या नातेवाईकांमध्ये करायचे होते. पण, शाह यांच्या कुटुंबाच्या वैद्यकीय इतिहासामध्ये रक्त विकार, शिकण्यात अक्षमता, अंधत्व आणि बहिरेपणा आदी समस्या आहेत. हे इनब्रीडिंगमुळे झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

अशी समस्या का निर्माण होते?

जोडीदारांपैकी एखाद्याला जर अनुवांशिक रोग असल्यास त्याने जवळच्या नातेवाईकाबरोबर लग्न केले तर नंतर समस्या निर्माण होतात. समुदायामध्ये विवाह केल्याने जोडीदारामध्ये समान अनुवांशिक समस्या उद्भवू शकतात. अशावेळी मुलाच्या जनुकामध्ये विकार होण्याची शक्यता वाढते. त्याच वेळी, जेव्हा समाजाच्या बाहेर लग्न केले जाते, तेव्हा मुलाला पालकांकडून वारशाने समस्या मिळण्याची शक्यता कमी होते.

आरोग्यतज्ज्ञ काय म्हणतात?

नात्यांमध्ये विवाह करणे हा इस्लामिक धार्मिक तत्व, परंपरांशी संबंधित असल्याचे कराचीतील आरोग्यतज्ज्ञ सिराज उद दौलाह यांनी सांगितले. ते म्हणाले, मी मौलवींना अनुवांशिक आजारांविषयी जागरूकता निर्माण करणे का गरजेचे आहे त्याविषयी सांगितेल. अशा नात्यातच केलेल्या विवाहांमुळे मुला-मुलींमध्ये अनुवांशिक रोग कसे वाढतात हे लोकांना सांगायाचीही विनंती केली. पण तरीही मौलवींनी हे विवाह इस्लामच्या शरिया कायद्यानुसार आणि प्रेषित मुहम्मद यांच्या परंपरेनुसार होतात, असं सांगत मदत करण्यास नकार दिला. त्यामुळे माझ्या प्रयत्नांना अपयश आलं असं त्यांनी सांगितल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

SRH vs PBKS Live Score : हैदराबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

SCROLL FOR NEXT