United Nations
United Nations 
ग्लोबल

पेगॅसस प्रकरणी संयुक्त राष्ट्राची एन्ट्री; सरकारला सुनावलं

कार्तिक पुजारी

पेगॅसस स्पायवेअर तंत्रज्ञानाचा वापर करुन जगभरातील नेते, पत्रकार आणि कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणामुळे भारतात राजकीय वातावरण तापू लागलं आहे.

नवी दिल्ली- पेगॅसस स्पायवेअर तंत्रज्ञानाचा वापर करुन जगभरातील नेते, पत्रकार आणि कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणामुळे भारतात राजकीय वातावरण तापू लागलं आहे. भारतातील अनेक पत्रकार आणि राजकीय नेत्यांविरोधात हेरगिरी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राने प्रतिक्रिया दिली असून हे प्रकरण अंत्यत चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. तसेच सरकारांनी अशाप्रकारच्या तंत्रज्ञानाच्या वापरावर रोख लावावी, कारण यामुळे मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचं म्हटलं आहे. (Pegasus spyware india united nations said worry to listen stop use of technology)

मानवाधिकाराची चिंता

संयुक्त राष्ट्रने म्हटलंय की, 'जागतिक मीडिया संघाने एक तपास केलाय. यामध्ये इस्त्रायलची कंपनी एनएसओ ग्रुपच्या सॉफ्टवेअरचा वापर करुन जगभरातील पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांची हेरगिरी करण्यात आली आहे. मानवाधिकासाठी हे चिंताजनक आहे.' संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त मिशेल बिचलेट म्हणाल्या की, विविध देशांमध्ये पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि राजकीय नेते यांच्यावर पेगॅसस स्पायवेअरच्या मदतीने हेरगिरी करण्यात आल्याचा खुलासा चिंताजनक आहे. सरकारांनी असल्या तंत्रज्ञानाचा वापर तत्काळ थांबवावा. शिवाय याला रोखण्यासाठी ठोस कारवाई करायला हवी.

एनएसओ कंपनीचा खुलासा

जगभरातील सार्वभौम देशांना पेगॅसस स्पायवेअर तंत्रज्ञानाचा पुरवठा करणाऱ्या एनएसओ कंपनीने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. एनएसओने हा आंतरराष्ट्रीय कट असल्याचं म्हटलं आहे. तसेच या तंत्रज्ञानाचा केवळ सार्वभौम सरकारांना करण्यात येतो, खासगी कंपन्यांना हे तत्रज्ञान दिलं नसल्याचं कंपनीने म्हटलंय. भारताला या तंत्रज्ञानाचा पुरवठा केलाय का? यावर उत्तर देताना एनएसओने म्हटले की, आम्ही कोणत्याही ग्राहकाची माहिती देत नाही. आमचे ग्राहक गुप्त ठेवले जातात. आम्ही कधीही या प्रणालाची दुरुपयोग केला नाही.

एनएसओ ग्रुपने सांगितलं की, सॉफ्टवेअरचा वापर कधीही फोनमधील संवाद ऐकण्यासाठी, ट्रॅक करण्यासाठी आणि माहिती गोळा करण्यासाठी केला जात नाही. काही मोजक्या देशांना हे तंत्रज्ञान दिले आहे. देशाची सुरक्षा या कारणासाठी सरकारच्या अधिकृत एजेन्सीला हे तंत्रज्ञान दिलं जातं. दहशतवादी आणि गुन्हे रोखण्यासाठी याचा वापर होता. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आतापर्यंत हजारो जीव वाचवण्यात यश आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT