taliban Google
ग्लोबल

तालिबानकडून पहिला झटका, भारताबरोबर थांबवला व्यापार

अफगाणिस्तानातून माल येणं बंद झालं आहे, असं फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे महासंचालक अजय सहाय यांनी सांगितले.

दीनानाथ परब

नवी दिल्ली: तालिबानने अफगाणिस्तानवर (Taliban afganistan) वर्चस्व मिळवल्यानंतर भारताबरोबरचा आयात-निर्यातीचा व्यापार (import-export trade) बंद केला आहे. तालिबानने रविवारी काबूलमध्ये (kabul) प्रवेश केला. त्यानंतर तिथली समीकरण बदलून गेली आहेत. तालिबानने सध्या पाकिस्तानमार्गे होणारी मालवाहतूक (cargo) बंद केली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातून माल येणं बंद झालं आहे, असं फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे महासंचालक अजय सहाय यांनी सांगितले.

"अफगाणिस्तानातील घडामोडींवर आमचे बारीक लक्ष आहे. तिथून पाकिस्तानमार्गे सामान आपल्याकडे येते. तालिबानने सध्या पाकिस्तानमार्गे होणारी मालवाहतूक बंद केली आहे. त्यामुळे आयात थांबली आहे" असे सहाय यांनी सांगितले. "खरंतर अफगाणिस्तानचे आपण सर्वात मोठे भागीदार आहोत.

वर्ष २०२१ मध्ये आपण अफगाणिस्तानला ८० कोटी डॉलर्सपेक्षा जास्त मालाची निर्यात केली. तिथून ५० कोटी पेक्षा जास्त मालाची आयात केली. व्यापाराशिवाय तिथे आपली मोठी गुंतवणूक आहे. अफगाणिस्तान आपण ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. अफगाणिस्तानात आपले ४०० प्रकल्प आहेत. त्यातले काही प्रकल्प सध्या सुरु आहेत" असे सहाय यांनी सांगितले.

व्यापारामध्ये भारताचे अफगाणिस्तान बरोबर चांगले संबंध आहेत. सध्या भारताकडून अफगाणिस्तानला साखर, औषध, चहा, कॉफी, कपडे, मसाले आणि ट्रान्समिशन टॉवरची निर्यात होते. तिथून ड्राय फ्रुटस, कांदा आणि गमची आपण आयात करतो अशी माहिती FIEO च्या महासंचालकांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्स न खेळताच स्पर्धेबाहेर होणार? वैभव सूर्यवंशीचे स्वप्न अपूर्ण राहणार... नेमकी भानगड काय?

Indigo-Air India: विमान प्रवास महागण्याची शक्यता! एअर इंडिया-इंडिगोची उड्डाण कपात; कारण काय? प्रवाशांना मोठा फटका

Cabinet Decision: फ्री रेशन योजनेत ३ मोठे बदल! ८० कोटी रेशनधारकांवर थेट परिणाम होणार; केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

आणि श्रुती मराठेने लगेच छत्री बंद केली... कलाकारांच्या नखऱ्यांबद्दल विचारताच प्रवीण तरडेंनी सांगितला तो किस्सा

महत्त्वाचे अपडेट्स : IPL आता मार्च-मे मध्ये नव्हे, तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार? दोन टप्प्यातही होऊ शकतं आयोजन; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT