kim jong un
kim jong un 
ग्लोबल

अमेरिकेला वाटतेय उत्तर कोरियाची चिंता; खायला अन्न नसल्याने देश बेहाल

विनायक होगाडे

सोल : कोरोना संसर्गाच्या काळात उत्तर कोरियामधील नागरिकांना अन्नधान्याची मोठी टंचाई जाणवत असून त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, असे अमेरिकेच्या उपपरराष्ट्र मंत्री वेंडी शेरमन यांनी म्हटले आहे. आपल्या नागरिकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदत मिळवून देण्यासाठी येथील सरकारने लवकरात लवकर त्यांच्या अणुकार्यक्रमावरील चर्चेला तयार व्हावे, असे आवाहनही शेरमन यांनी केले आहे. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी काही दिवसांपूर्वीच देशातील अन्नटंचाईबद्दल चिंता व्यक्त केली होती. तरीही, अमेरिकेबरोबर कोणतीही चर्चा करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. याबाबत पत्रकारांशी बोलताना शेरमन म्हणाल्या की,‘उत्तर कोरियाच्या नागरिकांची आम्हाला काळजी वाटत आहे. कोरोना आणि अन्नटंचाई अशी दोन संकटांना त्यांना सामना करावा लागत आहे. त्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी उत्तर कोरिया सरकारने अण्वस्त्र कार्यक्रम बंद करून शांतता चर्चा करावी.’

उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनी याआधी मान्य केलं होतं की त्यांचा देशात अन्यधान्याची टंचाई जाणवू लागली आहे. संयुक्त राष्ट्राला पाठवलेल्या एका रिपोर्टमध्ये उत्तर कोरियाने म्हटलं होतं की, त्यांचे धान्य भांडार जवळजवळ रिकामे झाले आहेत आणि त्यांना आंतरराष्ट्रीय मदतीची आवश्यकता आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी उत्तर कोरियात धान्य तुटवडा असल्याचा दावा अनेकदा केला होता. पण, किम जोंग उन यांनी हा दावा फेटाळला होता. मात्र, त्यानंतर पहिल्यांदा उत्तर कोरियाने अधिकृतरित्या देशातील गंभीर परिस्थिती मान्य केली होती.

उत्तर कोरियाचे शासक किम जोंग ऊन आपल्या मनमानी कारभारासाठी ओळखले जातात. असे सांगितले जाते की त्यांच्या कार्यकाळात उत्तर कोरिया वाईट परिस्थितीतून जात आहे. उत्तर कोरियाने संयुक्त राष्ट्राला एक रिपोर्ट पाठवला आहे. यात लिहिण्यात आलंय की, 2018 पासून देशातीन धान्य उत्पादन खालच्या स्तराला गेले आहे. ज्याचे मुख्य कारण नैसर्गिक आपत्ती आणि अपुऱ्या कृषी सुविधा सांगितलं जात आहे. उत्तर कोरियाकडे आजही आधुनिक कृषी उपकरणे नाहीत. त्यामुळे त्यांच्या धान्य उत्पादनात वाढ झालेली नाही. संयुक्त राष्ट्राला लिहिलेल्या रिपोर्टमध्ये उत्तर कोरियाने याचा उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे उत्तर कोरियाने पहिल्यांदा सार्वजनिक रित्या देशातील धान्य टंचाई मान्य केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT