ग्लोबल

LAC वर एकतर्फी बदल अमान्य; भारताने चीनला सुनावलं

सूरज यादव

दुशान्बे (ताजिकिस्तान) - भारत आणि चीन यांच्यात ताजिकिस्तानात झालेल्या शांघाय कार्पोरेशनच्या बैठकीवेळी LAC वरून चर्चा झाली. यामध्ये भारताने चीनला खडे बोल सुनावले आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं की, द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी सीमेवर शांती आणि सोहार्दपूर्ण वातावरण गरजेचं आहे. एकतर्फी बदल आजिबात मान्य केले जाणार नाहीत. या बैठकीवेली वरिष्ठ अधिकारी स्तरावर चर्चेसाठी दोन्ही देशांमध्ये एकमत झालं.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विटरवरून सांगितलं की, चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली. बैठकीत कोणत्याही प्रकारे एका बाजुने होणाऱ्या हालचाली मान्य केल्या जाणार नाहीत. दोन्ही नेत्यांमध्ये एससीओ बैठकीशिवाय जवळपास एक तास चर्चा झाली.

दहशतवाद आणि कट्टरतावाद यांना आळा घालणे, हाच शांघाय सहकार्य संघटनेचा (एससीओ) मूळ उद्देश असल्याने दहशतवादी कारवायांना मिळणारी आर्थिक रसद तोडणे अत्यंत आवश्‍यक आहे, अशी भूमिका परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज मांडली. ‘एससीओ’च्या परराष्ट्र मंत्री पातळीवरील बैठकीत जयशंकर यांनी भारताची भूमिका मांडली.

ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथे झालेल्या या बैठकीत जयशंकर यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थिती, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरील आशियातील आरोग्यस्थिती, अर्थव्यवस्था याबाबत मते मांडली. या बैठकीला चीन, रशिया, पाकिस्तानसह इतर सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री उपस्थित होते. जयशंकर यांनी, दहशतवादी संघटनांना आळा घालण्यासाठी त्यांना मिळणारे पाठबळ रोखण्याचा आग्रह धरला. तसेच, संसर्गाला आळा घालण्यासाठी ‘एक पृथ्वी एक आरोग्य’ ही भारताची भूमिका सर्वांनी अंगिकारणे आवश्‍यक असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

SCROLL FOR NEXT