US response after the conflict between India and China 
ग्लोबल

भारत आणि चीनमधील संघर्षानंतर अमेरिकेची आली प्रतिक्रिया; परराष्ट्रमंत्री माईक पोम्पियो म्हणतात...

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन- पूर्व लडाखमधील गालवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पोम्पियो यांनी ट्विट करुन भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. चीनसोबत झालेल्या हिंसक चकमकीत भारतीय जवानांनी आपला जीव गमावला, त्यांना मी श्रद्धांजली वाहतो. अमेरिका भारतीय नागरिकांप्रती संवेदना व्यक्त करते. या दु:खाच्या वातावारणात आम्ही सैनिकांचे कुटुंबीय, प्रियजन यांची आढवण ठेवू, असं पोम्पियो म्हणाले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गालवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांची झडप झाल्यानंतर अमेरिकेने यावर प्रतिक्रिया देत दोन्ही देशांना शांततेचे आवाहन केले होते. दोन्ही देश यावर शांततेतून मार्ग काढतील, असा विश्वास अमेरिकेने व्यक्त केला होता. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी भारत आणि चीनमधील तणाव कमी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अमेरिका दोन्ही देशातील सद्य स्थितीवर बारिक लक्ष ठेवून आहे. शिवाय संघर्षांत मृत्यू झालेल्या भारतीय जवानांबाबत आमची संवेदना आहे, असं प्रवक्त्यांनी म्हटलं होतं. 
---------
पिंपरी-चिंचवडमध्ये लोकप्रतिनीधींच्याही घरात शिरलाय कोरोना; नगरसेवकांनाही लागण
---------
घाबरु नका; तुमच्यासाठी इथे नोकरी उपलब्ध आहे; राज्य शासनाचा उपक्रम
---------
गालवान  खोऱ्यात सोमवारी रात्री झालेल्या संघर्षात भारताचे अनेक सैनिक जखमी झाले होते. मात्र, भारताचा कोणताही जवान गंभीर जखमी नसून त्यांची प्रकृची स्थिर असल्याचं सेना अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आमच्या सर्व जवानांची प्रकृती ठिक आहे. तसेच कोणीही गंभीर जखमी नाही. लेहच्या रुग्णालयात आपले 18 जवान आहेत. येत्या 15 दिवसांत ते पुन्हा कामावर रुजू होतील. शिवाय 56 जवान वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल असून त्यांना साधारण जखमा झाल्या आहेत. एक आठवड्याने हेही जवान कामावर येतील, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.   

दरम्यान, भारत आणि चीनच्या सैनिकांमधील हिंसक चकमकीमुळे दोन्ही देशातील संबंध अधिक चिघळण्याची शक्यता आहे. सोमवारी रात्री झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. तर चीनचेही 43 जवान मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे. 1967 नंतर पहिल्यांदाच भारत आणि चीनमधील वातावरण इतके उग्र बनले आहे. विशेष म्हणजे सोमवारी झालेल्या संघर्षात एकही गोळी चालवण्यात आली  नव्हती, तरी देखील इतक्या मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(19 जून) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. भारत आणि चीनमधील भविष्यातील संबंधाबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT