श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाय राजपक्षे-लष्करप्रमुख शावेंद्र सिल्वा. (संग्रहित) 
ग्लोबल

‘एलटीटीई’वरील विजयाचा सोहळा साधाच

वृत्तसंस्था

कोलंबो - तमिळ बंडखोरांना (एलटीटीई) नेस्तनाबूत करून श्रीलंका लष्कराने मिळविलेल्या विजयाचा मंगळवारी (ता. १९) अकरावा वर्धापनदिन आहे, मात्र देश कोरोना महामारीच्या विळख्यात सापडला असल्यामुळे मोठा सोहळा आयोजित करायचा नाही असे ठरले आहे.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

‘एलटीटीई’ने (लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम) सुमारे तीन दशके सशस्त्र उठाव केले होते. उत्तर आणि पूर्व प्रांत मिळून स्वतंत्र तमिळ राज्याची त्यांची मागणी होती, पण मे २००९ मध्ये लष्कराने जोरदार मोहिमेत त्यांचा खात्मा केला. त्यावर्षी १९ मे रोजी एलटीटीईचा म्होरक्‍या वेलुपिल्लई प्रभाकरन याचे प्रेत मिळाले होते.

लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल शावेंद्र सिल्वा यांनी सांगितले की, समारंभ साध्या पद्धतीने होईल. मुख्य समारंभ संसदेजवळ मंगळवारी होईल. अध्यक्ष गोटाबाय राजपक्षे अध्यक्षस्थान भुषवतील. अनेक वीर जवानांचा गौरव होईल. त्यांचे निकटवर्ती उपस्थित असतील. १९ मे हा ‘हिरो दीन’ म्हणून साजरा होत असल्यामुळे १४ हजार ६१७ जणांना बढती मिळेल.

तमिळ गट मेणबत्त्या लावणार
दरम्यान, तमिळ गटांतर्फे सांगण्यात आले की, तमिळ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आम्ही मेणबत्त्या लावू. आमच्या समारंभावर लष्कर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT