बीजिंग - पूर्व लडाखमधील गलवान खोरे गिळंकृत करू पाहणाऱ्या चीनच्या मनामध्ये भलतेच काहीतरी सुरू आहे. चीनच्या या विस्तारवादी धोरणाच्या मुळाशी ‘पाच बोटांची तिबेटी रणनीती असून यापासून भारताने योग्य तो धडा घ्यावा असा सूचक इशाराच केंद्रीय तिबेट प्रशासनाचे अध्यक्ष लोबसांग सांगाय यांनी दिला आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तेव्हापासून संघर्ष
डोकलाममध्ये २०१७ मध्ये झालेला संघर्ष आणि आता लडाखमध्ये उडालेली चकमक हा चीनच्या याच विस्तारवादी धोरणाचा परिपाक आहे. मागील साठ वर्षांपासून तिबेटी नेते भारताला हाच इशारा देत होते. चीनचा १९६२ साली भारताशी सर्वप्रथम संघर्ष झाला आणि तेव्हापासून त्यांनी गलवान खोऱ्यावर हक्क सांगायला सुरवात केली असे सांगाय यांनी नमूद केले. रणनितीकदृष्ट्या गलवान खोरे हे खूप महत्त्वपूर्ण आहे, भारताचा देरबूक, श्योक आणि दौलत बेग ओल्डी या रस्त्यामुळे लेह ते काराकोरम खिंड हे दोन्ही प्रदेश एकमेकांशी जोडल्या जातात, त्यामुळेच हा भाग बळकावण्याचा चीनचा इरादा असल्याचे त्यांनी सांगितले.
चीनसारखे वागावे लागणार
सीमावादावर चर्चेतून तोडगा काढावा लागेल. भारताला त्याच्या प्रदेशाचे सार्वभौमत्व जपण्याचा अधिकार आहे. एका बाजूने आमिष दाखवायचे आणि दुसऱ्या बाजूने धोका द्यायचा हे चीनचे जुने धोरण. भारताने देखील याचाच अंगीकार करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.