health-fitness-wellness

केळीच्या पानावर जेवणे आरोग्यासाठी फायद्याचे; जाणून घ्या कसे

सकाळ डिजिटल टीम

सध्या ही परंपरा कमी होत असून काही औपचारिक कार्यक्रमात किंवा समारंभाला याचा वापर केला जातो.

आपण अनेक दाक्षिणात्य घरांमध्ये किंवा काही हॉटेल्समध्ये पदार्थ केळीच्या पानातून वाढताना पाहिले असेल. किंबहूना असा अनुभवही आपण घेतला असाल. खूप वर्षापासूनची देशातील ही एक पारंपारिक परंपरा असल्याचे मानले जाते. देवांसाठी नैवेद्य द्यायचे झाल्यास केळीच्या पानांचा वापर केला जातो. सध्या आता ही परंपरा कमी होत असून काही औपचारिक कार्यक्रमात किंवा समारंभाला याचा वापर केला जातो. परंतु या केळीच्या पानांचा वापर करणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामधून आपण गरमागरम पदार्थ वाढल्यास या पानांत उपलब्ध असलेले न्युट्रीशन आणि अॅंटीऑक्सिडंटचे तत्व आहार अधिक हेल्दी बनवतात. अनेक पदार्थ या पानातून खाल्ल्याने नेमके कोणते फायदे होतात हे आपण आता जाणून घेणार आहोत.

पचन क्रियेसाठी होते मदत

केळीचे पान हे प्लांट कपांऊडने भरलेले असल्याने आरोग्यासाठी उत्तम असते. यामुळे अनेक आजार दूर होतात. यामध्ये असलेले अॅंटीऑक्सिडंटचे प्रमाण शरीरासाठी फायद्याचे ठरते. या पानांतून अन्न पदार्थ खाल्ल्याने पचनक्रीया सुधारते.

स्वाद वाढवते

एखादा पदार्थ केळीच्या पानातून खाल्ल्याने त्याचा स्वाद वाढतो असे मानले जाते. गरम पदार्थ यावर ठेवल्याने याचे लेअर विरघळून पदार्थात मिसळतात आणि ते अजून स्वादिष्ट होतात.

रसायन फ्री पदार्थ

जेव्हा आपण स्टील किंवा प्लॅस्टिकच्या काही भांड्यांतून अन्नपदार्थ खात असतो, तेव्हा त्याचे काही रासायनिक तत्व त्यात मिसळतात. याउलट केळीच्या पानामुळे रसायनिक मुक्त आणि हेल्दी पदार्थ आपण खाऊ शकतो.

इको फ्रेंडली

प्लास्टिकचे प्लेट किंवा काही अन्य वस्तू या पर्यावरणला घातक आहेत. तर एका बाजूला केळीची पाने ही पर्यावरणाला घातक ठरत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT