health-fitness-wellness

सौम्य लक्षणं असतील तर करू नका या चुका; अन्यथा कोरोना घेईल गंभीर रूप

अथर्व महांकाळ

नागपूर : कोरोनाच्या (Corona virus) दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण हे तरुण आहेत. त्याचबरोबर लहान मुलांमध्येही कोरोनाची (Corona in Young people) लक्षणं आढळतात आहे. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे तरुणांकडून करण्यात येणारं दुर्लक्ष. मात्र याचमुळे कोरोना रुग्ण गंभीर होऊ शकतात. म्हणूनच या चुका अजिबात करू नका आणि कोरोना गंभीर रूप धारण करण्यापासून परावृत्त करा. (Mistakes which brings corona at dangerous stage from mild stage)

False Negative पासून सावधान

कोरोनावर मात करायची असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्यवेळी निदान आणि त्यावरील उपचार. आजकाल false निगेटिव्हमुळे अनेक रुग्णांना भयन्कर परिणामांचासामना करावा लागू शकतो. त्यामुळे जर कोरोना निगेटिव्ह आली आणि तरीही लक्षणं असतील तर त्वरित डॉक्टरांशी बोला, त्यांचा सल्ला घ्या. कारण योग्यवेळी निदानच महत्वाचं आहे.

म्हणून गंभीर रूप घेतो कोरोना

सुरुवातीला काही सौम्य लक्षणांपासून कोरोनाची सुरुवात होते. मात्र शरीरातील काही गंभीर आजारांमुळे किंवा दुर्लक्ष केल्यामुळे कोरोना व्हायरस गंभीर रूप घेतो. हॅपी हायपॉक्सिया आणि इतर काही आजारांमुळेही तरुण पिढी मृत्यूच्या दाढेत ढकलली जातेय. म्हणूनच पहिल्या दिवसापासून रूग्णांनीही त्यांच्या कृतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही खबरदारीची खबरदारी घेतली पाहिजे, असंही डॉक्टरांचं मत आहे.

दुर्लक्ष पडू शकतं महागात

कोरोना गंभीर रूप घेण्यामागे दुर्लक्ष करणं हे एक कारण आहे. अनेकदा आपल्याला अनेक सौम्य लक्षणं असूनही आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. अनेकदा तर वातावरणामुळे ही लक्षणं असतील असा समज आपण करून घेतो. मात्र अतिदुर्लक्ष महागात पडू शकत. यामुळे कोरोना रुग्ण गंभीर होण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे कोरोनाच्या सौम्य, अतिसौम्य आणि गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

सुरुवातीलाच स्टिरॉइड्स घेऊ नका

अनेकदा गंभीर कोरोना रुग्णांना स्टिरॉइड्स देण्यात येतात. एक प्रकारचा उपचार म्हणून हे स्टिरॉइड्स देण्यात येतात. मात्र हे स्टिरॉइड्स सर्वच रुग्णांना देण्यात येत नाहीत. सर्व कोव्हिड प्रकरणांमध्ये स्टिरॉइड्स वापरण्याची आवश्यकता नाही. अंधाधुंध वापर, किंवा सौम्य संसर्गामध्ये वापरल्याने अडचणी उद्भवू शकतात. त्यामुळे सौम्य लक्षणं असल्यास लगेच स्टिरॉइड्स घेण्यास सुरुवात करू नका. यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात.

वेळीच डॉक्टरांचा सल्ला न घेणे

कोरोनाची सौम्य, अतिसौम्य किंवा गंभीर असे कुठलेही लक्षणं असतील तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. वेळीच डॉक्टरांचा सल्ला न घेतल्यास सौम्य लक्षणं गंभीर होऊ शकतात. लक्षणं जरी अगदी सौम्य किंवा इतर सर्दी -खोकल्यासारखे वाटत असतील तरीही डॉक्टरांकडे नक्की जा. यामुळे तुम्हाला कोरोनाचं योग्य निदान वेळेत मिळेल. डॉक्टरांचा सल्ला घेण्यास उशीर करू नका.

चाचणीसाठी उशीर

अनेकदा आपल्याला वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला किंवा ताप अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. मात्र आता ही लक्षणं साधीसुधी राहिली नाहीत. हीच कोरोनाची लक्षणंही आहेत. त्यामुळे अशी कुठलीही लक्षणं आढळल्यास सर्वात आधी कोरोनाची चाचणी करून घ्या. योग्य वेळी निदान झाल्यास गंभीर परिणाम होणार नाहीत. तसंच चाचणी पॉझिटिव्ह आल्यास विलगीकरणात राहा.

कोरोना चाचण्यांच्या रिपोर्टसाठी विलंब

अनेकदा तुम्ही चाचणी केल्यानंतरही रिपोर्ट येण्यासाठी एक ते दोन दिवसांचा कालावधी लागतो. मात्र त्यापेक्षा अधिक उशीर होऊ देऊ नका. तुमच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट त्वरित मिळवा. विलंब होत असल्यास त्या काळात विलगीकरणातच राहा. यामुळे तुमच्यामुळे इतर लोकांना कोरोनाची लागण होणार नाही.

(Mistakes which brings corona at dangerous stage from mild stage)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT