Sadguru
Sadguru sakal
health-fitness-wellness

इनर इंजिनिअरिंग : धर्मांमधील संघर्ष

सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन

धर्म हा आत वळण्याचा मार्ग आहे. दुर्दैवाने, अनेक लोकांसाठी, धर्म फक्त या किंवा त्या समुदायाशी संबंधित असण्याबद्दल बनला आहे.

धर्म हा आत वळण्याचा मार्ग आहे. दुर्दैवाने, अनेक लोकांसाठी, धर्म फक्त या किंवा त्या समुदायाशी संबंधित असण्याबद्दल बनला आहे. यामुळे लोकांमध्ये केवळ द्वेष, संघर्ष आणि दुरावा निर्माण झाला आहे. आज जे लोक एकत्र आहेत, ज्या क्षणी ते स्वतःची ओळख धर्मांशी बांधतात, तेव्हा ते अचानक वेगळे होतात. दुसऱ्या दिवशी ते एकमेकांची घरे जाळत असतात. दहा मिनिटांपूर्वी त्यांनी असा विचारही केला नसेल, पण ज्या क्षणी त्यांची ओळख एखाद्या धार्मिक समुदायाशी जोडली जाते, ते लढायला तयार होतात. जेव्हा ते या समुदायाशी संबंधित नसतात, तेव्हा किमान त्यांच्यात लढण्याचे काही कारण उरत नाही. कदाचित काही व्यक्ती काही वैयक्तिक कारणांसाठी भांडतील, ते वेगळे आहे. पण संपूर्ण समुदायाला भांडण्याचे काही कारण नाही. अशा प्रकारच्या हिंस्त्र स्वभावाला मोठ्या संख्येने उत्तेजना मिळणार नाही.

धर्माने लोकांना दैवी बनवायला हवे होते, पण तो त्यांना मानवसुद्धा बनवत नाही. ते पशुसारखे बनत आहेत, कारण ज्या क्षणी तुम्ही एखाद्या समूहात सामील होता, त्या क्षणी तुम्हाला तुमच्या गटाचे रक्षण करायचे असते. ही तुमच्यातील एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. ही एक अतिशय मूलभूत मानवी वृत्ती आहे. एकदा का तुम्ही तुमची ओळख एखाद्या विशिष्ट समुहाशी जोडली; की तुम्ही नेहमी दुसऱ्या समुहासाठी धोका असता; तुम्ही इतरांचे शत्रू बनता. कदाचित आपण एकमेकांशी बोलाल, आपण एकमेकांसोबत ठीक असाल, पण ज्या क्षणी काही सीमा ओलांडल्या जातात, त्या क्षणी युद्ध सुरू होते.

आपल्याला असे जग निर्माण करण्याची गरज आहे, जिथे व्यक्तींमध्ये आणि समाजाच्या संस्थामध्ये सर्वसमावेशक भाव असेल. आणि सर्वसमावेशकता हे केवळ आध्यात्मिक प्रक्रियांचे मूलभूत स्वरूप नाही, तर जीवनाचा मूळ आधार आणि ध्येय आहे. सर्वसमावेशक चेतनेमुळे ‘समावेशक अर्थशास्त्र’देखील होईल, कारण आर्थिक संधीचा अभाव हे दहशतवादाला खतपाणी घालण्याचे प्रमुख कारण आहे. जगातील प्रमुख आर्थिक शक्तींनी ‘समावेशक अर्थशास्त्र’ तयार करण्याचा प्रयत्न केला, तर तरुणांना दहशतवाद आणि दहशतवादी कृत्यांमध्ये जाण्याच्या इच्छा नाहीशा होऊ शकतात. एक मूलभूत गोष्ट जी शिक्षणात आली पाहिजे ती म्हणजे, प्रत्येक शाळेत जाणाऱ्या मुलाला पृथ्वीवरील पाच प्रमुख धर्मांना चालना देणाऱ्या मूलभूत तत्त्वांची ओळख करून दिली पाहिजे. आपण आपल्या मुलांमध्ये, वंश, धर्म, राष्ट्रीयत्वाची मर्यादित ओळख निर्माण करतो, ज्यामुळे हिंसाचाराचे समर्थन होते. प्रत्येक मुलाला ‘जागतिक गान’ शिकवण्याची आणि प्रत्येकामध्ये जागतिक ओळख रूजवण्याची वेळ आली आहे.

ही अशी गोष्ट नाही, जी तुम्ही एकदा दुरुस्त करून विसरून जाऊ शकता. नाही. यात सतत सुधारणा करणे गरजेची आहे. फक्त एकटा येशू ते करणार नाही; एकटे बुद्ध ते करणार नाही. यासाठी अनेकांची गरज आहे, तरच जगाला काही प्रमाणात सुस्थितीत ठेवण्याची शक्यता आहे. अन्यथा लोक सतत टोकाची भूमिका घेत राहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT