morning 
health-fitness-wellness

दिवसा झोपल्याने काय होतं? आयुर्वेद काय सांगते जाणून घ्या

अनेक लोकं दिवसा वेळ मिळेल तशी डुलकी घेतात

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येक व्यक्तीला ७ ते ८ तासांची रात्रीची झोप मिळणे गरजेचे असते. पण काहीवेळा एवढी झोप (Sleep) मिळाली नाही तर माणसाला दिवसभर थकल्यासारखे वाटते. अशावेळी मग दिवसभर वेळ मिळेल तेव्हा डुलकी घेतली जाते. पण हे तुमच्या तब्येतीसाठी (Health) फायदेशीर आहे का ते पाहणेही गरजेचे आहे. आयुर्वेदात( Ayurved) दिवसा झोपल्याने शरीरावर काय परिणाम होतात ते सांगितले आहे.

आयुर्वेद काय सांगतो?

दिवसा झोपणे हे आयुर्वेदाच्या दृष्टीने योग्य मानलं जात नाही. यामुळे कफ- पित्तावर परिणाम होऊन असंतुलन निर्माण होतात. त्यामुळे ज्या लोकांना कफ- पित्ताचा त्रास आहे त्यांनी दुपारी झोपू नये. मात्र निरोगी लोक अपवादात्मक परिस्थितीत दिवसा झोपू शकतात. तसेच ज्यांना मधुमेह आहे. जे लठ्ठपणामुळे ग्रस्त आहेत त्यांनीही दिवसा झोपू नये. कारण यामुळे त्यांचे वजन आणखी वाढण्याचा धोका असतो. तसेच स्मरणशक्तीवर परिणाम होऊन रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते.

sleep

दुपारची झोप घ्यावी का?

- दिवसा झोपेची सवय अनेकांना त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे रात्री चांगली झोप लागत नाही. तसेच आळशीपणा वाढू शकतो. दुपारी एक तासापेक्षा जास्त वेळ झोपल्यानं शरीर सुस्त होण्याचा धोका असतो. पण दिवसा झोपण्यापेक्षा दुपारची १५ -२० मिनीटांची झोप शरीरासाठी फायद्याची मानली जाते. त्यापेक्षा जास्त झोपल्यास शरीरात आळस आणखी वाढू शकतो. त्यामुळे दुपारी झोपताना अलार्म सेट करून झोपणे जास्त चांगले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: अमरावतीच्या सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा संप कायम

SCROLL FOR NEXT