Spring Season Health Care esakal
health-fitness-wellness

वसंत ऋतूत आरोग्य जपायचंय! आयुर्वेदानुसार हा घ्या डाएट प्लॅन

वसंत ऋतूत खूप लोकं आजारी पडतात

सकाळ डिजिटल टीम

ऋतु बदलला की त्याप्रमाणे हवेत बदल होतात. त्याप्रमाणे शरीरातही बदल होतात. म्हणून अशा काळात आपल्या आरोग्याची (Health) काळजी घेणे गरजेचे असते. ऋतुमानानुसार आहार आणि आरोग्य कसे जपावे हे आयुर्वेदात सांगितले आहे. सध्या वसंत ऋतू सुरू आहे. या काळात हवामानातील बदलामुळे सर्दी, खोकला, पचनशक्तीत समस्या निर्माण होतात. आयुर्वेदानुसार या काळात कफ दोष वाढू लागतो. तसेच या ऋतूत अग्नि तत्व कमी होऊ लागते आणि अपचन होण्याची समस्या वाढते. म्हणूनच वसंत ऋतूमध्ये निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदातील काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

गोड पदार्थ जास्त खाऊ नये

अशी घ्या काळजी

- वसंत ऋतूत पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी योग्य डाएट घेणे गरजेचे आहे.

- या दिवसात जास्त खाणे टाळले पाहिजे. जेव्हा भूक लागेल तेव्हाच खाल्ले पाहिजे.

- आयुर्वेदानुसार वसंत ऋतूत गोड खाणे टाळावे.

- वसंत ऋुतत जास्त खारट किंवा तेलकट अन्नपदार्थ खाऊ नयेत. असे केल्याने तुमच्या शरीरातील कफ वाढू शकतो.

- या काळात उडदाची डाळ तसेच पुरी- कचोरी सारखे जड पदार्थ खाणे टाळावे.

- तसेच जेवल्यानंतर लगेच झोपू नका. असे केल्याने शरीरातील कफ वाढू शकतो.

खिचडी

हे करा उपाय

-आयुर्वेदानुसार हवामान बदलावेळी खाण्यापिण्यावर विशेष लक्ष दिल्यास कफ होण्यापासून रक्षण होईल.

- या ऋतूत कारलं, पडवळ अश्या कडू रस असलेल्या पदार्थांचा ज्यूस किंवा सूप पिणे चांगले.

- जड अन्न खाण्यापेक्षा पचायला हलके असलेले पदार्थ खा. तुम्ही मूगडाळ, खिचडी, दलिया असे पदार्थ खाऊ शकता.

- दूधी, कोबी, गाजर, पालक, मटार यासारख्या पौष्टीक भाज्यांचा आहारात समावेश करायला हवा.

या काळात मध आणि गरम पाणी एकत्र प्यायल्यास कफदोष कमी होईल तसेच तुम्हाला सर्दी- खोकला होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT