ayurved
ayurved google
आरोग्य

आयुर्वेदिक औषधांचे सेवन सुरक्षित ठरते का ?

नमिता धुरी

मुंबई : विविध प्रकारच्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे महत्त्वाची मानली जातात. त्यांचे कोणतेही दुष्परिणाम शरीरावर होत नसल्याचे सांगितले जाते; मात्र आयुर्वेदिक औषधांच्या दीर्घकालीन सेवनाने शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.

नॅशनल लायब्ररी अॉफ मेडिसीनच्या लेखात दिलेल्या माहितीनुसार आयुर्वेदिक औषधांचा वापर रोगांना प्रतिबंध करण्यासाठी केला जातो. त्यांच्या दीर्घकालीन सेवनाने उलट्या, मळमळ, पोटदुखी, इत्यादी त्रास होऊ शकतात.

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. रेखा राधामणि यांनी आयुर्वेदाबाबत एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. अॅलोपथीप्रमाणे आयुर्वैदिक औषधेही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊ नयेत असे त्यांनी सांगितले आहे. तसे केल्यास शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो.

आयुर्वेदिक औषधांचा शरीरावर दुष्परिणाम होत नाही असे समजून तुम्ही अतिप्रमाणात आयुर्वेदिक औषधाचे सेवन करत असाल तर सावधान !

अश्वगंधा एक विषारी वनस्पती आहे. याचे सेवन न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला असतानाही त्याचे सेवन केल्यास मासिक पाळी अनियमित होते. आपल्याकडे अॅलोपथीप्रमाणे आयुर्वेदिक औषधांवर कोणतेही नियंत्रण नाही. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांच्या दुकानात ही ओषधे सहज उपलब्ध होतात. त्यामुळे आयुर्वेदिक औषधे कोणताही विचार न करता सहज घेतली जातात. याचा शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशी औषधे घेताना काळजी घ्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT