nagpur
nagpur sakal
आरोग्य

Blood donation : रक्तदान करताय तर ही काळजी घ्या...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - रक्तदानाचा समोरच्या व्यक्तीचा जीव वाचतो तसेच याचा फायदा रक्तदात्यालाही होतो. शरीरात नवीन रक्त तयार होण्यास मदत होते. रक्तदान करणाऱ्या व्यक्ती इतरांपेक्षा जास्त स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतात. रक्तदान करताना ठराविक गोष्टींची जर काळजी घेतली तर आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही. यामुळे रक्तदानाबद्दल अनेकांच्या मनात आजही अनेक शंका आहेत. या शंकांचे निरसन करण्याची गरज आहे. रक्तदान करण्यापूर्वी आणि रक्तदानानंतर हे लक्षात ठेवावे, असा सल्ला रक्तदात्यांना वैद्यकीय तज्ज्ञांकडून देण्यात आला.

हे लक्षात ठेवा

स्वस्थ पुरुष तीन महिन्यानंतर रक्तदान करू शकतात.

स्वस्थ महिला चार महिन्यांतून एकदा रक्तदान करू शकतात.

रक्तदान केल्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत नाही.

रक्तदान केल्यानंतर २१ दिवसांनंतर शरीरात नवीन रक्त तयार होते.

रक्तदान करण्याच्या एकदिवस आधी धूम्रपान करू नये.

रक्तदानाच्या ४८ तासांपूर्वी मद्यपान करू नये तसे केल्यास रक्तदान करू नये.

रक्तदान केल्यानंतर दर तीन तासांनी भरपेट खाणे गरजेचे आहे.

रक्तदानाबाबतचे गैरसमज

महिला रक्तदान करू शकत नाही.

रक्तदान केल्याने अशक्तपणा येतो.

रक्तदान केल्याने रोगप्रतिकारशक्ती खालावते.

रक्तदान केल्याने संसर्गाचा धोका असतो.

रक्तदान केल्याने वजन कमी होते.

माणसाचे आयुर्मान घटते.

रक्तदान हेच श्रेष्ठदान हे आपण जाणतोच. पण अनेकजण मनातील काही भीतीमुळे, चुकीच्या समजामुळे त्यापासून दूर राहतात. वास्तवात रक्तदानाच्या वेळेस फक्त ३५० मिली रक्त घेतले जाते. शरीरात सुमारे ५.५ लिटर रक्त असते. रक्तदानानंतर २४ तासात ब्लड व्हॉल्युम पुन्हा रिस्टोअर होते. मधुमेही व्यक्तीदेखील औषध किंवा आहाराच्या माध्यमातून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवल्यास रक्तदान करू शकतात. इन्शुलिन घेत असल्यास रक्तदान करू नका.

किशोर धर्माळे, सामाजिक अधीक्षक, रक्तपेढी, मेडिकल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT