healthy lifestyle सकाळ
आरोग्य

पावसाळ्यात वजन वाढतंय? या सोप्या टिप्स फॉलो करा आणि वाढत्या वजनाला ब्रेक लावा

आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात वजन वाढू नये म्हणून काही टिप्स फॉलो करायला सांगणार आहोत

सकाळ डिजिटल टीम

पावसाळ्यात अनेक समस्या वाढतात मग ती केस गळती असो की त्वचेचे आजार असो. अनेकदा वजन वाढण्याच्या समस्या सुद्धा पावसाळ्यात आढळून येतात. यामागील कारण म्हणजे पावसाळ्यात आपल्याला अनेकदा तेलकट पदार्थ भजी, समोसे खायला आवडतात. त्यामुळे याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि आपलं वजन वाढतं.

आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात वजन वाढू नये म्हणून काही टिप्स फॉलो करायला सांगणार आहोत. (follow these tips and and stop weight gaining in rainy monsoon season)

  • पावसाळ्यात अँटीऑक्सिडंट्सनी परीपुर्ण असलेली फळे खा. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. त्यामुळे पावसाळ्यात चिकू, लीची, जांभळ अशी फळं खा. ही फळं खाल्ल्याने तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही.

  • पावसाळ्यात भुख खूप लागते. त्यामुळे थोडं थोडं खाल्याने आपल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

  • पावसाळ्यात गोड कमी खा कारण यामुळे सर्वात जास्त वजन वाढण्याची शक्यता असते. एवढचं काय तर कमी साखरेचा चहा पिण्यास तुमचे वजन नियंत्रणात राहू शकते.याशिवाय तुम्ही ग्रीन टी सुद्धा पिऊ शकता.

  • पावसाळ्यात भरपूर पाणी प्यायला हवे.भरपूर पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील टॉक्सीन्स बाहेर फेकले जातात. तसेच तुम्हाला भूकही कमी लागते.त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.


  • हेल्दी फुड खाणे हे वजन नियंत्रणात आणण्यासाठी खुप गरजेचं आहे. तुम्हाला जर वजन नियंत्रणात आणण्याचे असेल तर हेल्दी सुप, हेल्दी फु़ड खावे ज्यामुळे तुमचं वजन वाढणार नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT